शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महापूर नियंत्रणाचा प्रकल्प होईपर्यंत पूर सहन करायचा का?; नदीपात्रातील भराव, झाडे, गाळ काढण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:27 IST

सर्वेक्षण करण्यासाठी ६ महिने लागणार

कोल्हापूर : कोल्हापूरसहसांगलीला येणाऱ्या महापूर नियंत्रणासाठीचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत स्थानिक पातळीवर महापालिका, पाटबंधारे विभाग आणि नदीपात्राच्या जवळ असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे गरजेचे आहे. प्रकल्प कसा राबवायचा याचे सर्वेक्षण करण्यासाठी ६ महिने लागणार आहेत. आता तीन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल, पुढच्या तीन वर्षांत किमान तीनवेळा तरी पूर येण्याची शक्यता आहे. या तीन वर्षांसाठी संबंधित विभागांनी त्यांच्या पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने मित्र संस्थेच्या माध्यमातून पंचगंगा व कृष्णा नदीला येणाऱ्या महापूर नियंत्रणासाठी ३२०० कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मागील आठवड्यात बँकेच्या टीमसमाेर प्रकल्पाचे सादरीकरण झाले. त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

हा प्रकल्प पूर्ण व्हायला किमान ३ किंवा त्याहून जास्तच वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत कोल्हापूरकरसांगलीकरांनी महापूर आला तर काय करायचे या प्रश्नावर आता प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी काेल्हापूर महापालिका, पाटबंधारे विभाग, नगरपालिका, नदीकाठ नजीक राहणारी गावे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न केले तरी पूर नियंत्रणासाठी मदत होईल.

हे हटवले तरी पूर नियंत्रित होईल

  • पंचगंगा घाटावर नवीन पूल उभारताना नदीपात्रात बांधलेले रस्ते, भराव, पिलर, भिंती.
  • पुराने वाहून आलेल्या मातीचा थर भोवतीने साचून नदीचे पात्र कमी झाले. प्रवाहाची दिशा बदलली.
  • शिरोली भागात एकाच ठिकाणी तीन पुलांच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणात भराव तयार.
  • पुलांच्या ठिकाणी तयार झालेले पोटमाळे काढून पाणी वाहण्यासाठीचा मार्ग मोकळा व्हावा.
  • नदीपात्रातील मोठी झाडे, गवत, सिमेंटचे थर, बांधकामासाठी तात्पुरते तयार केलेले रस्ते.
  • बंधाऱ्याजवळ साचलेला गाळ.

प्रकल्पाचे टप्पे

  • पहिले सहा महिने : सर्वेक्षण
  • पुढचे सहा महिने : प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे
  • त्यानंतरचे सहा महिने : निविदा प्रक्रिया, नियुक्ती
  • त्यानंतरचे दीड ते दोन वर्षे : प्रत्यक्ष प्रकल्पातील कामांची अंमलबजावणी.

पूर नियंत्रणासाठीचे प्रकल्प होतील तेव्हा होतील, पण तोपर्यंत स्थानिक प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करावेत. वर्षानुवर्षे केलेले सिमेंटचे भराव, गाळ, गवत, झाडे, पुलांच्या बांधकामाच्या वेळी टाकलेले साहित्य, तयार झालेली लहान बेटे हटविण्यात यावीत. -महादेव खोत निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरSangliसांगली