संक्षिप्त वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:19+5:302021-03-27T04:24:19+5:30
कोल्हापूर : शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘गगन दमामा बाज्यो’ या दोनअंकी नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग उद्या रविवारी सकाळी साडेअकरा ...

संक्षिप्त वृत्त
कोल्हापूर : शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘गगन दमामा बाज्यो’ या दोनअंकी नाटकाचा प्रारंभाचा प्रयोग उद्या रविवारी सकाळी साडेअकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात सादर होत आहे. काफिला थिएटर्स व महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसच्यावतीने नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.
समाजातील युवकांपर्यंत भगतसिंग यांचे विचार पोहोचावेत, हा यामागचा उद्देश आहे. यात ३० कलाकारांनी भूमिका निभावली आहे. पियुष मिश्रा यांनी लेखन केले असून, सतीश तांदळे यांनी अनुवाद केला आहे. शंतनू पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे. तरी रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार
कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठानतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीसाठी भरीव योगदान दिलेल्या ज्येष्ठ कलाकारांचा आज शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होईल. तरी रसिकांनी या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. गुरूदत्त म्हाडगुत, निर्माता संदीप जाधव, राहुल चौधरी यांनी केले आहे.
-----------
भावगीत स्पर्धेत अरुण कुलकर्णी प्रथम
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने आयोजित भावगीत स्पर्धेत अरुण कुलकर्णी यांना प्रथम क्रमांक मिळाला. मोहन मानकर, नंदकुमार कल्याणकर, पुष्पा कुलकर्णी, वसंत थोरात यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्यांना श्रीकृष्ण वाघ, रजनी हिरळीकर, यशस्विनी जनवाडकर यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.
अंजली निगवेकर, संदेश गावंदे, जितेंद्र बागडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सुहासिनी जगताप यांनी प्रायोजकत्व केले. संघाचे अध्यक्ष मानसिंगराव जगताप यांनी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आर. डी. नार्वेकर, के. बी. गुरव, शोभा पोर्लेकर, सुरेश मिरजकर, बंडोपंत कांबळे, श्रीकांत आडिवरेकर उपस्थित होते.
--
उदय पाटील यांची निवड
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या कोल्हापूर जिल्हा मुख्य सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या माध्यमातून महिला अत्याचार, बालशोषण, जातीय तेढ याविरोधात काम केले जाते.
---
सत्याग्रहींना मानधन मिळावे
कोल्हापूर : आणीबाणी काळातील राजबंदी व सत्याग्रहांनी मंजूर झालेले मानधन मिळावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लोकतंत्र सेनानी संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब गणपुले, जिल्हा चिटणीस प्रमोद जोशी, पांडुरंग म्हातुगडे, माधुरी कुंभार, कृष्णा सातपुते, बाळासाहेब शिंदे, भगवान मिस्त्री आदी उपस्थित होते.
--