शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

धक्कादायक ! आंघोळीवरुन वाद झाल्यानं सासऱ्याने कोयत्यानं तोडले सूनेचे हात, नातवांवरही केले सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:33 IST

आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सास-यानं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

ठळक मुद्देआंघोळीच्या पाण्यावरुन वाददोन्ही नातवांवरही परळीचे वार सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले

कोल्हापूर - आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सास-यानं सून आणि नातवांवर कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मल्हारपेठ सावर्डे येथील पन्हाळा तालुक्यातील गावात बुधवारी (14 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या वादातून सास-यानं चक्क आपल्या सूनेचे कोयत्याने हातच तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आंघोळीच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून सासऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यादरम्यान आईला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणा-या दोन्ही नातवांवरही त्याने कोयत्यानं वार केले. या घटने सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूनेची प्रकृती गंभीर आहे.

मल्हारपेठ-सावर्डे या गावातील पांडुरंग दशरथ सातपुते (वय ६0) यांनी बुधवारी सकाळी आंघोळीसाठी प्रथम नंबर कुणाचा यावरुन वाद घालत सून शुभांगी रमेश सातपुते (वय ३0) हिच्यावर कोयत्यानं वार केला. यात तिचे दोन्ही हात तुटले. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा-या  मयुरेश (वय ९) आणि कनिष्क (वय ४) या दोन नातवांच्या डोक्यावरही पांडुरंग यांनी कोयत्यानं वार केल्याने ते जखमी झाले आहेत. या झटापटीत पांडुरंगदेखील जखमी झाले.या चौघांनाही उपचारासाठी कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सून शुभांगी हिचे दोन्ही हात तुटले असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिला शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत कळे पोलीस ठाण्यात सासरे पांडुरंग सातपुते यांच्याविरोधात  गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर