शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शिवाजी विद्यापीठ : ‘एमबीए’चा निकाल तीनवेळा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:31 IST

शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल तीनवेळा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : ‘एमबीए’चा निकाल तीनवेळा जाहीरविद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था; एटीकेटीमध्ये बदल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल तीनवेळा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून दि. १३ जुलैला पहिल्यांदा या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पंधरा दिवसांनी या निकालामध्ये आॅनलाईन बदल करण्यात आला. पुन्हा दि. १८ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात आला.

विद्यापीठाकडून तीनवेळा निकालात झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पहिल्यांदा जाहीर झालेल्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी हे अखेरच्या निकालात अनुत्तीर्ण झाले आहेत.

विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी चार विषयांची एटीकेटी रद्द करून तीन विषयांसाठी केली आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या निकालात तीनवेळा झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

निकालातील बदलांबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांना नेमकी माहिती विद्यापीठाकडून मिळत नाही. विद्यापीठाने येत्या दोन दिवसांत निकालाबाबतची सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष ऋतुराज माने यांनी सोमवारी दिला.

अभ्यास मंडळाच्या नियमानुसार निकालविद्यापीठातील ‘एमबीए’च्या अभ्यास मंडळाच्या परीक्षा पद्धतीबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत अभ्यास मंडळ आणि अधिकार मंडळे जो निर्णय घेतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी