शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

शिवाजी विद्यापीठ : ‘एमबीए’चा निकाल तीनवेळा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:31 IST

शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल तीनवेळा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठ : ‘एमबीए’चा निकाल तीनवेळा जाहीरविद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था; एटीकेटीमध्ये बदल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल तीनवेळा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून दि. १३ जुलैला पहिल्यांदा या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर पंधरा दिवसांनी या निकालामध्ये आॅनलाईन बदल करण्यात आला. पुन्हा दि. १८ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात आला.

विद्यापीठाकडून तीनवेळा निकालात झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पहिल्यांदा जाहीर झालेल्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी हे अखेरच्या निकालात अनुत्तीर्ण झाले आहेत.

विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी चार विषयांची एटीकेटी रद्द करून तीन विषयांसाठी केली आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या निकालात तीनवेळा झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

निकालातील बदलांबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांना नेमकी माहिती विद्यापीठाकडून मिळत नाही. विद्यापीठाने येत्या दोन दिवसांत निकालाबाबतची सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष ऋतुराज माने यांनी सोमवारी दिला.

अभ्यास मंडळाच्या नियमानुसार निकालविद्यापीठातील ‘एमबीए’च्या अभ्यास मंडळाच्या परीक्षा पद्धतीबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत अभ्यास मंडळ आणि अधिकार मंडळे जो निर्णय घेतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी