शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Shivaji University : प्रलंबित निकालामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:55 IST

प्रलंबित असलेल्या निकालामुळे विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे.

ठळक मुद्देप्रलंबित निकालामुळे वर्ष वाया जाण्याची भीतीप्रवेश घेण्यात अडचणी; अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची अडचण

कोल्हापूर : प्रलंबित असलेल्या निकालामुळे शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे.पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेची प्रवेशपत्रे, अर्ज आणि निकाल लावण्याबाबतच्या प्रक्रियेचे कामकाज शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका संस्थेकडे दिले. या संस्थेच्या माध्यमातून होणारे परीक्षाविषयक कामकाज थांबविण्यात आले.

मात्र, या संस्थेकडे परीक्षांबाबतच्या माहितीचे हस्तांतरण करून घेण्याचे काम अद्यापही पूर्णपणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून झालेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत.

काही विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालात त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. निकाल प्रलंबित असल्याने आणि त्यामध्ये त्रुटी असल्याने सुधारित निकाल मिळालेला नाही. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

प्रथम आणि द्वितीय वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत, त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशनिश्चिती केली आहे. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाअभावी मोठी अडचण झाली आहे.

दरम्यान, याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली कार्यवाही जाणून घेण्यासाठी या मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल घेतला नाही.

नीट माहिती देत नाहीतबी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., आदी अभ्यासक्रमांचे निकाल प्रलंबित आहेत. निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी निकालाबाबत महाविद्यालयात चौकशी केली असता, त्यांना विद्यापीठात चौकशी करण्यास सांगितले जात आहे.

निकालाच्या अनुषंगाने विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागात दूरध्वनीवरून अथवा प्रत्यक्षात येऊन विचारणा केली असता, नीट माहिती दिली जात नाही. त्यात अनेकदा टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार सातारा, सांगलीतील विद्यार्थ्यांकडून होत आहे.

प्रवेश अथवा परीक्षा अर्ज आणि शुल्क भरणे, पात्रता सादर करणे, आदी प्रक्रियेची पूर्तता करून घेण्यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या माध्यमातून वारंवार सूचना केल्या जातात.

पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित कामकाज असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य अधिकारी सांगतात. मात्र, निकालाच्या अनुषंगाने नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे, त्याची नीट माहिती देण्यात विद्यापीठाकडून का टाळाटाळ केली जात आहे? असा सवाल या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी