शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Shivaji University : प्रलंबित निकालामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:55 IST

प्रलंबित असलेल्या निकालामुळे विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे.

ठळक मुद्देप्रलंबित निकालामुळे वर्ष वाया जाण्याची भीतीप्रवेश घेण्यात अडचणी; अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची अडचण

कोल्हापूर : प्रलंबित असलेल्या निकालामुळे शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे.पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेची प्रवेशपत्रे, अर्ज आणि निकाल लावण्याबाबतच्या प्रक्रियेचे कामकाज शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका संस्थेकडे दिले. या संस्थेच्या माध्यमातून होणारे परीक्षाविषयक कामकाज थांबविण्यात आले.

मात्र, या संस्थेकडे परीक्षांबाबतच्या माहितीचे हस्तांतरण करून घेण्याचे काम अद्यापही पूर्णपणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून झालेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत.

काही विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालात त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे. निकाल प्रलंबित असल्याने आणि त्यामध्ये त्रुटी असल्याने सुधारित निकाल मिळालेला नाही. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

प्रथम आणि द्वितीय वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत, त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशनिश्चिती केली आहे. मात्र, अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाअभावी मोठी अडचण झाली आहे.

दरम्यान, याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली कार्यवाही जाणून घेण्यासाठी या मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल घेतला नाही.

नीट माहिती देत नाहीतबी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., आदी अभ्यासक्रमांचे निकाल प्रलंबित आहेत. निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी निकालाबाबत महाविद्यालयात चौकशी केली असता, त्यांना विद्यापीठात चौकशी करण्यास सांगितले जात आहे.

निकालाच्या अनुषंगाने विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागात दूरध्वनीवरून अथवा प्रत्यक्षात येऊन विचारणा केली असता, नीट माहिती दिली जात नाही. त्यात अनेकदा टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार सातारा, सांगलीतील विद्यार्थ्यांकडून होत आहे.

प्रवेश अथवा परीक्षा अर्ज आणि शुल्क भरणे, पात्रता सादर करणे, आदी प्रक्रियेची पूर्तता करून घेण्यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या माध्यमातून वारंवार सूचना केल्या जातात.

पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित कामकाज असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य अधिकारी सांगतात. मात्र, निकालाच्या अनुषंगाने नेमकी काय अडचण निर्माण झाली आहे, त्याची नीट माहिती देण्यात विद्यापीठाकडून का टाळाटाळ केली जात आहे? असा सवाल या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी