शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

शिवाजी सावंत यांची कर्णकथा पन्नाशीत

By admin | Updated: September 12, 2016 00:51 IST

कोल्हापुरातील पोलिस क्वार्टर्समध्ये झाला ‘मृत्युंजय’चा जन्म

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर ज्या वयात रंगीबेरंगी स्वप्नं पाहायची, त्या वयात तेविशीतील एक युवक चिंतन करीत होता. महाभारतातील कर्ण त्याच्या मनात घट्ट रुतला होता. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाचं दु:ख त्याच्या उरात दाटलं होतं. त्या तरुणानं निर्धार केला कर्णाला न्याय देण्याचा. प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर तीन महिने राहून, अखंड वाचनानंतर केलेल्या चिंतनातून कोल्हापुरातील दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्सच्या एका खोलीत बसून त्यानं ही कर्णकथा लिहिली. ती वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आणि शिवाजी सावंत या २७ वर्षांच्या युवकाला ‘मराठा’च्या अग्रलेखातून प्र. के. अत्रे यांनी ‘मृत्युंजयकार’ ही पदवी बहाल केली. ‘मृत्युंजय’ कादंबरीचे बुधवारी (दि. ७) सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले शिवाजी सावंत शाळकरी वयात नाटकात कृष्णाची भूमिका करतात; पण त्यांना भावतो तो कर्ण. पुढे कोल्हापुरात आल्यानंतर मेन राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहँडचे शिक्षक म्हणून काम करताना त्यांना करवीर वाचन मंदिराचा लळा लागला. महाभारतावरील विविध गं्रथ वाचताना कर्ण त्यांना अधिकच खुणावू लागला. मग त्यांनी त्या दृष्टीने वाचन सुरूच ठेवले. आता त्यांनी थेट कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय घेतला. पैशांचा प्रश्न होता. पहिला धनादेश भालजी पेंढारकर यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अगदी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत अनेकांनी याकामी मदत केली. कुरुक्षेत्राचा दौरा करून आलेल्या शिवाजीरावांनी त्यांचे मोठे भाऊ, जे पोलिस दलात कार्यरत होते, त्यांच्या दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्समध्ये मुक्काम ठोकला. आतापर्यंत मनात कर्णाबद्दल जे काही साठलं होतं, ते झपाटल्यागत झरझर उतरायला सुरुवात केली. दीड हजार पानांचं हे बाड तयार झालं. कोल्हापुरात कुणी त्याला हात लावायला तयार झालं नाही. शिवाजीरावांचे मित्र आर. के. कुलकर्णी हे हस्तलिखित आणि शिवाजीरावांना घेऊन ग. दि. माडगूळकरांना भेटले. माडगूळकरांनी कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णी यांना चिठ्ठी दिली आणि ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. ७ सप्टेंबर १९६७ रोजी पहिल्या प्रतीचे पूजन झाले. या पोलिस क्वार्टर्समधील १२ क्रमांकाच्या खोलीत ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. आज तिथे कुणी राहत नाहीत. तिथे राहणारे पोलिस हवालदार निवृत्त झाले. ज्या खोलीत मराठी साहित्यविश्वातील इतिहास घडला, तिथे आता ‘निर्धार’ या संस्थेच्या वतीने लावण्यात आलेली शिवाजीरावांची फक्त प्रतिमा आहे. ३० आवृत्त्या, सहा भाषांमध्ये भाषांतर, इंग्रजीत अनुवादाच्या साहित्यातील ‘नोबेल’साठी नामांकन आणि लाखो वाचकांचे प्रेम मिळविणारी ही कादंबरी आता पन्नाशीची झाली आहे. कोठे, काय पहाल? ‘मृत्युंजय’ला ४९ वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात अनेक माणसं अशी भेटली की, त्यांनी सांगितलं की, मी ‘मृत्युंजय’मुळे उभा राहिलो. आत्महत्येचे विचारही मनात आलेला एखादा सांगतो की, ‘मृत्युंजय’मुळे माझा विचार बदलला. ‘मृत्युंजय’च्या इंग्रजी भाषांतराचे साहित्यातील नोबेलसाठी कोलक ात्याहून नामांकन झाले होते. एखाद्या कादंबरीमुळे माणूस आयुष्यात पुन्हा उभं राहणं हे ‘नोबेल’च आहे, असं मी त्यांना म्हणायचे. नव्या पिढीतील मुलं-मुली जेव्हा ‘मृत्युंजय’बद्दल सांगतात, तेव्हा समाधान वाटतं. - मृणालिनी शिवाजीराव सावंत