शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

शिवाजी सावंत यांची कर्णकथा पन्नाशीत

By admin | Updated: September 12, 2016 00:51 IST

कोल्हापुरातील पोलिस क्वार्टर्समध्ये झाला ‘मृत्युंजय’चा जन्म

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर ज्या वयात रंगीबेरंगी स्वप्नं पाहायची, त्या वयात तेविशीतील एक युवक चिंतन करीत होता. महाभारतातील कर्ण त्याच्या मनात घट्ट रुतला होता. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाचं दु:ख त्याच्या उरात दाटलं होतं. त्या तरुणानं निर्धार केला कर्णाला न्याय देण्याचा. प्रत्यक्षात कुरुक्षेत्रावर तीन महिने राहून, अखंड वाचनानंतर केलेल्या चिंतनातून कोल्हापुरातील दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्सच्या एका खोलीत बसून त्यानं ही कर्णकथा लिहिली. ती वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आणि शिवाजी सावंत या २७ वर्षांच्या युवकाला ‘मराठा’च्या अग्रलेखातून प्र. के. अत्रे यांनी ‘मृत्युंजयकार’ ही पदवी बहाल केली. ‘मृत्युंजय’ कादंबरीचे बुधवारी (दि. ७) सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले शिवाजी सावंत शाळकरी वयात नाटकात कृष्णाची भूमिका करतात; पण त्यांना भावतो तो कर्ण. पुढे कोल्हापुरात आल्यानंतर मेन राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहँडचे शिक्षक म्हणून काम करताना त्यांना करवीर वाचन मंदिराचा लळा लागला. महाभारतावरील विविध गं्रथ वाचताना कर्ण त्यांना अधिकच खुणावू लागला. मग त्यांनी त्या दृष्टीने वाचन सुरूच ठेवले. आता त्यांनी थेट कुरुक्षेत्रावर जाण्याचा निर्णय घेतला. पैशांचा प्रश्न होता. पहिला धनादेश भालजी पेंढारकर यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अगदी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत अनेकांनी याकामी मदत केली. कुरुक्षेत्राचा दौरा करून आलेल्या शिवाजीरावांनी त्यांचे मोठे भाऊ, जे पोलिस दलात कार्यरत होते, त्यांच्या दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्समध्ये मुक्काम ठोकला. आतापर्यंत मनात कर्णाबद्दल जे काही साठलं होतं, ते झपाटल्यागत झरझर उतरायला सुरुवात केली. दीड हजार पानांचं हे बाड तयार झालं. कोल्हापुरात कुणी त्याला हात लावायला तयार झालं नाही. शिवाजीरावांचे मित्र आर. के. कुलकर्णी हे हस्तलिखित आणि शिवाजीरावांना घेऊन ग. दि. माडगूळकरांना भेटले. माडगूळकरांनी कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णी यांना चिठ्ठी दिली आणि ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. ७ सप्टेंबर १९६७ रोजी पहिल्या प्रतीचे पूजन झाले. या पोलिस क्वार्टर्समधील १२ क्रमांकाच्या खोलीत ‘मृत्युंजय’चा जन्म झाला. आज तिथे कुणी राहत नाहीत. तिथे राहणारे पोलिस हवालदार निवृत्त झाले. ज्या खोलीत मराठी साहित्यविश्वातील इतिहास घडला, तिथे आता ‘निर्धार’ या संस्थेच्या वतीने लावण्यात आलेली शिवाजीरावांची फक्त प्रतिमा आहे. ३० आवृत्त्या, सहा भाषांमध्ये भाषांतर, इंग्रजीत अनुवादाच्या साहित्यातील ‘नोबेल’साठी नामांकन आणि लाखो वाचकांचे प्रेम मिळविणारी ही कादंबरी आता पन्नाशीची झाली आहे. कोठे, काय पहाल? ‘मृत्युंजय’ला ४९ वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात अनेक माणसं अशी भेटली की, त्यांनी सांगितलं की, मी ‘मृत्युंजय’मुळे उभा राहिलो. आत्महत्येचे विचारही मनात आलेला एखादा सांगतो की, ‘मृत्युंजय’मुळे माझा विचार बदलला. ‘मृत्युंजय’च्या इंग्रजी भाषांतराचे साहित्यातील नोबेलसाठी कोलक ात्याहून नामांकन झाले होते. एखाद्या कादंबरीमुळे माणूस आयुष्यात पुन्हा उभं राहणं हे ‘नोबेल’च आहे, असं मी त्यांना म्हणायचे. नव्या पिढीतील मुलं-मुली जेव्हा ‘मृत्युंजय’बद्दल सांगतात, तेव्हा समाधान वाटतं. - मृणालिनी शिवाजीराव सावंत