शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘शिवराज्याभिषेक दिन’ हा सार्वभौमत्वाचा सोहळा - इंद्रजित सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:48 IST

गडसंवर्धन झाले पाहिजे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांच्या चरित्रांवर सखोल संशोधन केले पाहिजे. - इंद्रजित सावंत

ठळक मुद्दे इतिहास जपण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : दि. ६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या निमित्ताने दरवर्षी रायगडावर मोठा सोहळा होतो. लाखो शिवभक्त महाराजांच्या विचारांची ज्योत घेऊन गडउतार होतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेवरून वाद आहेत; त्यामुळे ती वर्षातून तीन वेळा साजरी होते; पण शिवराज्याभिषेक दिनाबद्दल इतिहासात स्पष्ट उल्लेख असल्याने हा दिवस एकत्र साजरा केला जातो. हा सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. या घडामोडीतील महत्त्वाचे शिलेदार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची ही चर्चेतील मुलाखत...प्रश्न : ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा करण्यास सुरुवात कशी झाली?उत्तर : सुरुवातीला ‘शिवराज्याभिषेक दिन’ आरएसएस तसेच विशिष्ट वर्गाकडून ‘हिंदू साम्राज्य दिन’ म्हणून साजरा केला जात होता. त्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम व्हायचा. शिवरायांचे स्वराज्य सार्वभौम होते. त्यात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हती किंवा धर्माचा अभिनिवेष नव्हता. त्यामुळे त्याचे होणारे धार्मिक ध्रुवीकरण आम्हांला मान्य नव्हते. शिवाय तो तिथीमुळे कोणत्याही महिन्यात साजरा व्हायचा. सगळ्यांनी एकत्र यावे यासाठी आम्ही तो तारखेवर आणला आणि २००० सालापासून शिवराज्याभिषेक दिन ६ जूनला साजरा होऊ लागला.

प्रश्न : हा दिवस लोकोत्सव करण्यामागे काय प्रेरणा होती?उत्तर : आम्ही हा दिवस साजरा करायला सुरुवात केली तेव्हा रायगडावरदेखील मोजकी ५००-६०० माणसं असायची. शिवाजी महाराज हे कालातीत राजे आहेत. त्यांना केवळ महाराष्ट्रात किंवा विशिष्ट समाजापुरते मर्यादित का ठेवायचे? प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य, त्यांचे कार्य, विचार यांचा जागर व्हायचा असेल तर या दिवसाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनात रुजले पाहिजे याची जाणीव झाली; म्हणून तो लोकोत्सव व्हावा अशी आमची इच्छा होती. या प्रेरणेतून कोल्हापुरात मराठा महासंघाच्या वतीने २००६ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

आणखी काय बदल होणे अपेक्षित आहेहा एक दिवसाचा उत्सव न होता गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व्हायला हवे. रायगडावर मुख्य सोहळा होत असला तरी आता तो महाराष्ट्रासह परदेशातही साजरा होतो, हेही काही कमी नाही. यानिमित्ताने लोकांनी एकत्र येऊन विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. शिक्षण, पर्यावरण, कायदा सुव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत चांगले काम करता येईल.

विचार कृतीत आणणे महत्त्वाचे

रायगडावर हा सोहळा सुरू झाला तेव्हा जिथे रिकामी मेघडंबरी होती तेथे शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी सगळ्यांची इच्छा होती. खासदार संभाजीराजे यांनी यात पुढाकार घेतला आणि २००९ मध्ये तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला. महाराजांची सोन्याची मूर्ती बनविण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणणे जास्त महत्त्वाचे आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवणे ही आता तरुण पिढीची जबाबदारी आहे. या निमित्ताने गडसंवर्धन झाले पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांच्या चरित्रांवर सखोल संशोधन केले पाहिजे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेक