शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवराज्याभिषेक दिन’ हा सार्वभौमत्वाचा सोहळा - इंद्रजित सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:48 IST

गडसंवर्धन झाले पाहिजे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांच्या चरित्रांवर सखोल संशोधन केले पाहिजे. - इंद्रजित सावंत

ठळक मुद्दे इतिहास जपण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : दि. ६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या निमित्ताने दरवर्षी रायगडावर मोठा सोहळा होतो. लाखो शिवभक्त महाराजांच्या विचारांची ज्योत घेऊन गडउतार होतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेवरून वाद आहेत; त्यामुळे ती वर्षातून तीन वेळा साजरी होते; पण शिवराज्याभिषेक दिनाबद्दल इतिहासात स्पष्ट उल्लेख असल्याने हा दिवस एकत्र साजरा केला जातो. हा सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. या घडामोडीतील महत्त्वाचे शिलेदार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची ही चर्चेतील मुलाखत...प्रश्न : ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा करण्यास सुरुवात कशी झाली?उत्तर : सुरुवातीला ‘शिवराज्याभिषेक दिन’ आरएसएस तसेच विशिष्ट वर्गाकडून ‘हिंदू साम्राज्य दिन’ म्हणून साजरा केला जात होता. त्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम व्हायचा. शिवरायांचे स्वराज्य सार्वभौम होते. त्यात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हती किंवा धर्माचा अभिनिवेष नव्हता. त्यामुळे त्याचे होणारे धार्मिक ध्रुवीकरण आम्हांला मान्य नव्हते. शिवाय तो तिथीमुळे कोणत्याही महिन्यात साजरा व्हायचा. सगळ्यांनी एकत्र यावे यासाठी आम्ही तो तारखेवर आणला आणि २००० सालापासून शिवराज्याभिषेक दिन ६ जूनला साजरा होऊ लागला.

प्रश्न : हा दिवस लोकोत्सव करण्यामागे काय प्रेरणा होती?उत्तर : आम्ही हा दिवस साजरा करायला सुरुवात केली तेव्हा रायगडावरदेखील मोजकी ५००-६०० माणसं असायची. शिवाजी महाराज हे कालातीत राजे आहेत. त्यांना केवळ महाराष्ट्रात किंवा विशिष्ट समाजापुरते मर्यादित का ठेवायचे? प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य, त्यांचे कार्य, विचार यांचा जागर व्हायचा असेल तर या दिवसाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनात रुजले पाहिजे याची जाणीव झाली; म्हणून तो लोकोत्सव व्हावा अशी आमची इच्छा होती. या प्रेरणेतून कोल्हापुरात मराठा महासंघाच्या वतीने २००६ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

आणखी काय बदल होणे अपेक्षित आहेहा एक दिवसाचा उत्सव न होता गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व्हायला हवे. रायगडावर मुख्य सोहळा होत असला तरी आता तो महाराष्ट्रासह परदेशातही साजरा होतो, हेही काही कमी नाही. यानिमित्ताने लोकांनी एकत्र येऊन विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. शिक्षण, पर्यावरण, कायदा सुव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत चांगले काम करता येईल.

विचार कृतीत आणणे महत्त्वाचे

रायगडावर हा सोहळा सुरू झाला तेव्हा जिथे रिकामी मेघडंबरी होती तेथे शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी सगळ्यांची इच्छा होती. खासदार संभाजीराजे यांनी यात पुढाकार घेतला आणि २००९ मध्ये तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला. महाराजांची सोन्याची मूर्ती बनविण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणणे जास्त महत्त्वाचे आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवणे ही आता तरुण पिढीची जबाबदारी आहे. या निमित्ताने गडसंवर्धन झाले पाहिजे. तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांच्या चरित्रांवर सखोल संशोधन केले पाहिजे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivrajyabhishekशिवराज्याभिषेक