शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ‘कोल्हापूर उत्तर’ द्या, आम्ही आमदार देतो; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला शब्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:02 IST

‘माताेश्री’च्या बाहेर वादावादी

कोल्हापूर: शहरातील आमदार शिवसेनेचाच हवा असा आग्रह बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्यामुळे तुम्ही आम्हाला ‘कोल्हापूर उत्तर’ द्या आम्ही तुम्हाला ‘आमदार’ देतो, असा शब्द शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. ‘मातोश्री’वर दिवसभर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते.उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रवी इंगवले, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, वैभव उगळे, संजय चौगले उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी दहाही मतदारसंघांतील पदाधिकारी, शिवसेनेची स्थिती, महाविकास आघाडीतील अन्य पक्षांशी राजकीय संबंध कसे आहेत, याची माहिती घेतली.यावेळी शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी उत्तर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी आग्रही मागणी केली. आम्ही चार जण इच्छुक आहोत. त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही त्याच्या पाठीशी राहतो. तुम्ही उमेदवारी दिली तर शिवसेनेचा आमदार येथून निवडून येऊ शकतो, याची ग्वाही दिली. लोकसभेची जागा काँग्रेसला दिली आहे, आता ही जागा आपल्याकडे घ्या, असे सांगितले.

राधानगरी हा आपलाच मतदारसंघ असून, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले येथून आपले उमेदवार याआधी निवडून आले आहेत, याचीही माहिती यावेळी देण्यात आली. मतदारसंघनिहाय ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या मतदारसंघात शिवसेनेची स्थिती चांगली आहे तेथे आग्रह धरतानाच आघाडीधर्म पाळण्याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दहा लाख घरात मशाल पोहोचवानवरात्राच्या काळात आपल्याला मिळालेले मशाल हे चिन्ह जिल्ह्यातील १० लाख घरांमध्ये पोहोचवा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. एका विधानसभा मतदारसंघात एक लाख मशाल चिन्ह याप्रमाणे दहाही मतदारसंघांत चिन्ह पोहोचवून लोकांच्या संपर्कात राहा असे सांगण्यात आले. त्यानुसार घटस्थापनेपासून या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचे पवार आणि देवणे यांनी सांगितले.

‘माताेश्री’च्या बाहेर वादावादीशहरातील एका पदाधिकाऱ्याला एक उपशहरप्रमुख ‘मातोश्री’बाहेर दिसले. या बैठकीला उपशहरप्रमुख किंवा अन्य कोणी अपेक्षित नसल्याने या शहर पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही इकडे कसे’ अशी विचारणा केली. याचा गैरअर्थ या शहरप्रमुखांनी घेतला आणि वादाला सुरुवात झाली. प्रकरण हमरीतुमरीवर आल्याने अखेर इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला. मात्र शुक्रवारी संध्याकाळनंतर मुंबईतील ‘मातोश्री’बाहेरील या वादाची चर्चा कोल्हापुरात रंगली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना