शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:20 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ.

कोल्हापूर : आम्ही या सर्वांना प्रेम दिलं, संपूर्ण विश्वास ठेवला, मानाची पदं दिली. इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं. तरीही यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हीच सांगा आमचं नेमकं काय चुकलं, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे मिरजकर तिकटीला झालेल्या सभेत शिवसैनिकांना विचारला.रात्री भर पावसात आदित्य यांनी व्यासपीठावरून खाली येऊन उपस्थितांशी संवाद साधला. एकीकडे आपली बाजू मांडतानाच हा माणुसकीचा घात असल्याचे सांगत शिंदे गटाच्या आमदार, खासदारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. या सभेला जल्लोषी प्रतिसाद मिळाला. या सभेत कोल्हापूर आणि निपाणीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.फडफडणारे भगवे ध्वज, शिवसेना गीत आणि एकापेक्षा एक आक्रमक भाषणे सुरू असताना ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्वागत स्वीकारल्यानंतर सर्वांना अभिवादन करून आदित्य भर पावसात खाली आले. त्यांनी एका खुर्चीवर उभारूनच आपले अर्ध्या तासाचे भाषण पूर्ण केले. शिवसैनिकांना प्रश्न विचारत त्यांच्याशी साधलेल्या शिवसैनिकांनीही तितक्याच उत्स्फूर्तपणे आदित्य यांना दाद दिली.ठाकरे म्हणाले, हे बंड आहे, उठाव असे म्हणतात. परंतु हे सर्व जण गद्दार आहेत आणि गद्दार हीच त्यांची ओळख राहणार आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा, वाढतच चाललेली भूक यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. गेलाच आहात तर जा. पण तुमच्यात हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा हे माझे आव्हान आहे.ठाकरे म्हणाले, ज्यांनी कोरोना काळात चांगले काम केले, ज्यांच्या काळात जातील दंगली झाल्या नाहीत. ते उध्दव ठाकरे आणखी मोठे झाले तर आपले काय अशी भीती काही जणांना वाटत होती. यातूनच हे घडले.जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, काही लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी बाजूला गेले. परंतु जनता, शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहे. देवमाणसाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला आहे. मी हे आजारी असताना पुष्पगुच्छ घेऊन दवाखान्यात भेटायला गेलो. परंतु उशीखाली यांनी खंजीर ठेवला होता हे मला माहिती नव्हते, असा टोला पवार यांनी राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, विशाल देवकुळे यांचीही भाषणे झाली. सुनील मोदी यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख रवी इंगवले आणि हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. सभेला आदेश बांदेकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, नियाज खान, महेश उत्तुरे, नवेज मुल्ला, बाजीराव पाटील, राजू यादव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले..

गद्दारांमधील काही जणांना फसवून नेण्यात आलं आहे. त्यांनाही आता खरोखरच आपण उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटत असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.साडेतीन गद्दार..खासदार विनायक राऊत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ आहे. आजऱ्यात एकाचा पंचनामा केला. इथंही एक अर्धवटराव आहे. नकली धर्मवीरही आहे. आनंद दिघे खरोखरच धर्मवीर होते. हे नकली धर्मवीर दिल्लीला चाटूगिरी करायला निघाले आहेत. केवळ आणि केवळ उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी हा सर्व डाव आहे.

प्रचंड उत्साह

आदित्य ठाकरे यांच्या या सभेवेळी उपस्थितांचा प्रचंड उत्साह जाणवत होता. घोषणा, फुटीरांबद्दल शेरेबाजी शेवटपर्यंत सुरू होती. ठाकरे यांनी अतिशय सहज पध्दतीने संवाद साधत, प्रश्न विचारत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे