शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं, तरीही..; आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:20 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ.

कोल्हापूर : आम्ही या सर्वांना प्रेम दिलं, संपूर्ण विश्वास ठेवला, मानाची पदं दिली. इतर मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातंदेखील यांना दिलं. तरीही यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हीच सांगा आमचं नेमकं काय चुकलं, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे मिरजकर तिकटीला झालेल्या सभेत शिवसैनिकांना विचारला.रात्री भर पावसात आदित्य यांनी व्यासपीठावरून खाली येऊन उपस्थितांशी संवाद साधला. एकीकडे आपली बाजू मांडतानाच हा माणुसकीचा घात असल्याचे सांगत शिंदे गटाच्या आमदार, खासदारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. या सभेला जल्लोषी प्रतिसाद मिळाला. या सभेत कोल्हापूर आणि निपाणीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.फडफडणारे भगवे ध्वज, शिवसेना गीत आणि एकापेक्षा एक आक्रमक भाषणे सुरू असताना ठाकरे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्वागत स्वीकारल्यानंतर सर्वांना अभिवादन करून आदित्य भर पावसात खाली आले. त्यांनी एका खुर्चीवर उभारूनच आपले अर्ध्या तासाचे भाषण पूर्ण केले. शिवसैनिकांना प्रश्न विचारत त्यांच्याशी साधलेल्या शिवसैनिकांनीही तितक्याच उत्स्फूर्तपणे आदित्य यांना दाद दिली.ठाकरे म्हणाले, हे बंड आहे, उठाव असे म्हणतात. परंतु हे सर्व जण गद्दार आहेत आणि गद्दार हीच त्यांची ओळख राहणार आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा, वाढतच चाललेली भूक यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. गेलाच आहात तर जा. पण तुमच्यात हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा हे माझे आव्हान आहे.ठाकरे म्हणाले, ज्यांनी कोरोना काळात चांगले काम केले, ज्यांच्या काळात जातील दंगली झाल्या नाहीत. ते उध्दव ठाकरे आणखी मोठे झाले तर आपले काय अशी भीती काही जणांना वाटत होती. यातूनच हे घडले.जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, काही लोकप्रतिनिधी स्वार्थासाठी बाजूला गेले. परंतु जनता, शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच आहे. देवमाणसाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला आहे. मी हे आजारी असताना पुष्पगुच्छ घेऊन दवाखान्यात भेटायला गेलो. परंतु उशीखाली यांनी खंजीर ठेवला होता हे मला माहिती नव्हते, असा टोला पवार यांनी राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला.यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, रवी चौगुले, विशाल देवकुळे यांचीही भाषणे झाली. सुनील मोदी यांनी सूत्रसंचालन केले. शहरप्रमुख रवी इंगवले आणि हर्षल सुर्वे यांच्या संपर्क कार्यालयाचे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. सभेला आदेश बांदेकर, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, नियाज खान, महेश उत्तुरे, नवेज मुल्ला, बाजीराव पाटील, राजू यादव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातोश्रीचे दरवाजे अजूनही खुले..

गद्दारांमधील काही जणांना फसवून नेण्यात आलं आहे. त्यांनाही आता खरोखरच आपण उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटत असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.साडेतीन गद्दार..खासदार विनायक राऊत म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन गद्दारांना गाडायचं आहे. त्यासाठीच्या विजयाची ही मुहूर्तमेढ आहे. आजऱ्यात एकाचा पंचनामा केला. इथंही एक अर्धवटराव आहे. नकली धर्मवीरही आहे. आनंद दिघे खरोखरच धर्मवीर होते. हे नकली धर्मवीर दिल्लीला चाटूगिरी करायला निघाले आहेत. केवळ आणि केवळ उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला एकटे पाडण्यासाठी हा सर्व डाव आहे.

प्रचंड उत्साह

आदित्य ठाकरे यांच्या या सभेवेळी उपस्थितांचा प्रचंड उत्साह जाणवत होता. घोषणा, फुटीरांबद्दल शेरेबाजी शेवटपर्यंत सुरू होती. ठाकरे यांनी अतिशय सहज पध्दतीने संवाद साधत, प्रश्न विचारत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे