शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला, कायमस्वरूपी निवारा केंद्र उभारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:16 IST

सहा गावांत निवारा केंद्रांचा प्रस्ताव

संदीप बावचेजयसिंगपूर : पावसाळा सुरु झाला असून, तालुका प्रशासनही सज्ज आहे. विविध पातळीवर तयारी आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे अनेक पूरग्रस्तांना स्थलांतरित व्हावे लागते. तालुक्यात कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. जागतिक बँकेनेही आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून अथवा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत निवारा केंद्रे उभारण्यासाठी निधी मिळू शकतो. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.गेल्या १९ वर्षांत शिरोळ तालुक्याला चारवेळा महापुराचा फटका बसला आहे. सन २०१९ साली आतापर्यंतचा उच्चांक मोडून महापूर आला होता. जवळपास ४७ गावांना यावेळी पुराचा फटका बसला होता. १० हजार ३६५ कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले होते. यामध्ये ६५ हजार २१३ नागरिक स्थलांतरित झाले होते. नातेवाइकांबरोबर स्वत: पर्यायी व्यवस्था करणारी लोकसंख्या ४५ हजार ६१९ होती. तर १९ हजार ५९४ पूरग्रस्त निवारा केंद्रात होते. ४२ ठिकाणी निवारा केंद्राची सोय करण्यात आली होती. महापुराची ही परिस्थिती पाहता मनुष्यहानी होऊ नये, पशुधनाला फटका बसू नये यासाठी प्रशासनाकडून पर्यायी लोकप्रतिनिधींकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मान्सूनपूर्व तयारी केली जाते. आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेऊन शिरोळ तालुक्यात कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली होती. तालुक्यात महापुरामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित व्हावे लागते. मात्र निवाऱ्याची सोय नसल्याने अनेक पूरग्रस्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी गायरान जमिनीमध्ये कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारावीत, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत निधीचा पर्यायतालुक्यातील धरणगुत्ती, नांदणी, तेरवाड, टाकळीवाडी, अब्दुललाट व जैनापूर या सहा ठिकाणी निवारा केंद्रांचा प्रस्ताव आहे. याठिकाणी कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारल्यास जवळपास ४६ गावांतील पूरग्रस्तांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. जयसिंगपूर येथे मान्सूनपूर्व आढावा बैठकीत निवारा केंद्राबाबत पुन्हा एकदा नव्याने चर्चा झाली. त्यामुळे जागतिक बँकेकडून निधी मंजूर झाला आहे. या निधीतून निवारा केंद्र उभारण्यासाठी पर्याय उभा राहू शकतो. शिवाय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत देखील निवारा केंद्रासाठी निधीचा पर्याय आहे.

कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभारावीत यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यापूर्वीच मागणी केली होती. महापुराच्या काळात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी निवारा केंद्रे सोयीची ठरणार आहेत. त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. - आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरshirol-acशिरोळ