शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

...तर शिंगणापूर उपसा केंद्र बंद पाडू : ग्रामस्थ

By admin | Updated: July 4, 2015 00:46 IST

हद्दवाढीला विरोध : वीस गावांतील ग्रामस्थ एकवटले

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावरून ‘शहरी व ग्रामीण’ असा वाद आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा काही नगरसेवकांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून, जर पाणीपुरवठा बंद केला तर शिंगणापूर हद्दीत असलेले महानगरपालिकेचे पाणी उपसा केंद्र बंद पाडले जाईल, असा इशारा २० गावांतील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला. करवीर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच २० गावांतील सरपंच, उपसरपंच, आदींच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांची भेट घेऊन शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीस ठाम विरोध दर्शविला.तसे लेखी निवेदनही त्यांना देण्यात आले. शहराचा विकास करायला महानगरपालिकेला जमले नाही. आता आमची गावे घेऊन काय विकास करणार आहेत? असा सवाल काहींनी केला. हद्दवाढीला आमचा ठाम विरोध आहे. तो विचारात घेतला नाही, तर मात्र सरकारविरोधात न्यायालयात जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.गेल्याच आठवड्यात शहरातील हद्दवाढ कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जर हद्दवाढीला विरोध केला जाणार असेल तर संबंधित गावांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी ग्रामस्थांकडून, शिंगणापूर येथील महानगरपालिकेचे पाणी उपसा केंद्र बंद पाडले जाईल, असा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात करवीर पंचायत समितीच्या सभापती पूनम जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक, माजी सभापती दिलीप टिपुगडे, जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ पाटील, बाबासो माळी, मनीषा वास्कर, पंचायत समिती सदस्य भूजगोंडा पाटील, सचिन पाटील, जयसिंग काशीद, उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले, शियेच्या सरपंच लक्ष्मी फडतरे, वडणगेचे उपसरपंच सचिन चौगुले, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)हद्दवाढविरोधी समितीचा उद्या मेळावाकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे कळंबा येथील अमृतसिद्धी सभागृहामध्ये उद्या, रविवारी दुपारी एक वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, बाबा देसाई, भगवान काटे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास हद्दवाढीतील प्रस्तावित २० गावांमधील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सूचना व मते विचारात घेण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीने पत्रकाद्वारे केले आहे.