शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘शेकाप’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:06 IST

यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देफाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न : शेतकरी एकही देणे देणार नाहीत : संपतराव पवार-पाटील

कोल्हापूर : शेतकºयाला विनाअट सरसकट शंभर टक्के कर्जमाफी देण्यात यावी, महापुरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, परतीच्या पावसाने उरलीसुरली पिकेही नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाचा दरवाजा ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.

दसरा चौक येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीमध्ये शेतकºयाचा आक्रोश आणि व्यथा मांडणारे फलक लावले होते; तर ‘शेती वाचवा, अन्नदाता जगवा’, ‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी’ असे फलक आंदोलकांच्या हातांत झळकत होते. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी आंदोलकांनी बंद फाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखताना पोलिसांशी झटापट होऊन काहीवेळ गोंधळ उडाला. यावेळी संपतराव पवार-पाटील व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आंदोलकांनी फाटकासमोरच ठिय्या मारत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना संपतराव पवार-पाटील यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत व शेतकºयांना कर्जमाफी अद्याप मिळालेली नसून ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकरी वीज, महसूल, ग्रामपंचायत यातील कोणतेही सरकारी देणे देणार नाहीत, असा इशारा संपतराव पवार-पाटील यांनी दिला.यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मागण्या अशा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनापात्र शेतकºयांना कर्जमाफीत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापारी, शेतकºयांना मूल्यांकन करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, कृषी वीजपंप पाईपलाईन मिळावी, वीज मीटर बदलून कृषिपंपाची बिले माफ करावीत, सरकारी पाणीपट्टी माफ करावी, चालू ऊस गळीत हंगामाकरिता कृषिमूल्य आयोगाने ‘एफआरपी’ची किंमत बदललेली नाही, ती वाढवावी, उसाची ‘एफआरपी’ ऊस कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसांत देण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती बंदीचा निर्णय मागे घ्यावा.

आंदोलनात जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबूराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार-पाटील, वसंत कांबळे, अमित कांबळे, राजेंद्र देशमाने, उज्ज्वला कदम, बाबासाहेब देवकर, एकनाथ पाटील, संजय डकरे, सुशांत बोरगे, आदींसह शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते 

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर