शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘शेकाप’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:06 IST

यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देफाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न : शेतकरी एकही देणे देणार नाहीत : संपतराव पवार-पाटील

कोल्हापूर : शेतकºयाला विनाअट सरसकट शंभर टक्के कर्जमाफी देण्यात यावी, महापुरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, परतीच्या पावसाने उरलीसुरली पिकेही नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाचा दरवाजा ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.

दसरा चौक येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीमध्ये शेतकºयाचा आक्रोश आणि व्यथा मांडणारे फलक लावले होते; तर ‘शेती वाचवा, अन्नदाता जगवा’, ‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी’ असे फलक आंदोलकांच्या हातांत झळकत होते. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी आंदोलकांनी बंद फाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखताना पोलिसांशी झटापट होऊन काहीवेळ गोंधळ उडाला. यावेळी संपतराव पवार-पाटील व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आंदोलकांनी फाटकासमोरच ठिय्या मारत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना संपतराव पवार-पाटील यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत व शेतकºयांना कर्जमाफी अद्याप मिळालेली नसून ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकरी वीज, महसूल, ग्रामपंचायत यातील कोणतेही सरकारी देणे देणार नाहीत, असा इशारा संपतराव पवार-पाटील यांनी दिला.यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मागण्या अशा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनापात्र शेतकºयांना कर्जमाफीत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापारी, शेतकºयांना मूल्यांकन करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, कृषी वीजपंप पाईपलाईन मिळावी, वीज मीटर बदलून कृषिपंपाची बिले माफ करावीत, सरकारी पाणीपट्टी माफ करावी, चालू ऊस गळीत हंगामाकरिता कृषिमूल्य आयोगाने ‘एफआरपी’ची किंमत बदललेली नाही, ती वाढवावी, उसाची ‘एफआरपी’ ऊस कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसांत देण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती बंदीचा निर्णय मागे घ्यावा.

आंदोलनात जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबूराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार-पाटील, वसंत कांबळे, अमित कांबळे, राजेंद्र देशमाने, उज्ज्वला कदम, बाबासाहेब देवकर, एकनाथ पाटील, संजय डकरे, सुशांत बोरगे, आदींसह शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते 

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर