शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी शेट्टी यांची भेट संविधान मोर्चा तयारी : राजकीय चर्चा झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे; ‘संविधान बचाव’च्या भूमिकेतून नेते एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:12 AM

कोल्हापूर : सर्व विरोधी पक्षांतर्फे येत्या २६ जानेवारीस मुंबईत काढण्यात येणाºया ‘संविधान बचाव मोर्चा’च्या तयारीसाठी बुधवारी दुपारी दोन्ही काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

कोल्हापूर : सर्व विरोधी पक्षांतर्फे येत्या २६ जानेवारीस मुंबईत काढण्यात येणाºया ‘संविधान बचाव मोर्चा’च्या तयारीसाठी बुधवारी दुपारी दोन्ही काँग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट झाली. विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यात ही भेट झाली; परंतु त्यामध्ये अन्य कोणतीच अथवा राजकीय चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संविधान मोर्चा नेमका कसा असावा, याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड व खासदार शेट्टी उपस्थित होते. या मोर्चाला दि. २६ रोजी मुंबई विद्यापीठासमोरील आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होईल. तो गेटवे आॅफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येईल. तिथे दोन तास धरणे आंदोलन होईल. हा मोर्चा कुण्याही एका पक्षाचा नाही. ‘संविधान बचाव’ अशी भूमिका असलेले सर्व समाजांतील व सर्व स्तरांतील लोक त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. त्याला कोणीही एक नेता नाही, एक पक्ष नाही, की एक झेंडा असणार नाही. त्यामध्ये कोणतीही घोषणाबाजी होणार नाही किंवा एकही नेता तिथे भाषणबाजी करणार नाही, अशी आचारसंहिता या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.खासदार शेट्टी हे केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशव्यापी एकजूट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेट्टी यांच्या संघटनेचीही ताकद आता महाराष्ट्रभर वाढली आहे. भाजपला विरोध करणारे शेट्टी हे अन्य पक्षांपासून समान अंतरावर राहणार असल्याचे सांगत असले तरी ते निवडणुकीपर्यंत काहीतरी राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या घडामोडींची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी ‘संविधान मोर्चा’च्या निमित्ताने होत असलेली एकजूट कारणीभूत ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मुंबईत बुधवारी विरोधी पक्षनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विखे-पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची बैठक झाली. संविधान मोर्चाच्या तयारीची चर्चा या बैठकीत झाली.