शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

CoronaVirus Lockdown : ‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊन, अस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:46 IST

एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊनअस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी

सचिन भोसले कोल्हापूर : एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.अशा लॉकडाऊन झालेल्या साने गुरुजी वसाहत येथील क्रशर चौकालगतच्या एका कॉलनीतील ‘अस्मिता’ची कहाणी काही औरच आहे.अस्मिता ही रजनी व पंडित मारुलकर यांची एकुलती एक कन्या. जन्म १९७६ सालचा. नियमित मुलांसारखी ती बागडत होती. अचानकपणे १९७९ साली तिचे चालणे, बोलणे बंद झाले. ती केवळ हुंकार देऊ लागली. त्यानंतर आजतागायत ४२ वर्षांचा कालावधी गेला; ती अजूनही एका खुर्चीत अक्षरश: ‘लॉकडाऊन’ आहे.

 तिच्या खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व सोपस्कर आईवडील करतात. त्यांची वयेही बघितली तर अनुक्रमे ७५ आणि ८० अशी आहेत. दोघेही न कंटाळता, केवळ ती पुन्हा पायावर उभी राहावी, या आशेने ही सेवा करीत आहेत. मारुलकर दाम्पत्याचा एकच कार्यक्रम म्हणजे अस्मिता पुन्हा उभी व्हावी, या आशेवर तिची एकसारखी सेवा, तीही न थकता करीत राहणे. दोघांनी तर कधी नातेवाइकांचे किंवा जवळच्या मंडळींचे लग्न, समारंभ, आदी पाहिलेलेच नाहीत. नातवंडांना खेळवायच्या वयात त्यांना मुलीला उचलावे लागत आहे. घरात काही बाजार वगैरे आणायचे म्हटले तर एकाला बाहेर जावे लागते, तर एकाला तिच्याबरोबर राहावे लागते.

गेल्या ४२ वर्षांनंतर मारुलकर पती-पत्नी आजही थकलेले नाहीत. केवळ त्यांची वये वाढली आहेत. त्यांचा उत्साह तर तरुण पिढीला लाजविणारा आहे. अस्मिता तर गेल्या ४२ वर्षांपासून एका खुर्चीत लॉकडाऊन आहे. अशा पद्धतीने लॉकडाऊन झालेल्या अस्मिताला आपण बरे होऊ, असा आशेचा किरण आहे. मग लोकांना २१ दिवसांचा लॉकडाऊन सहन का होईना?अस्मिताचे वडील पंडित मारुलकर हे शिवाजी विद्यापीठातून उपकुलसचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तिवेतन मिळते. त्यांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे त्यांच्या व पत्नी रजनी यांच्या पश्चात त्यांच्या निवृत्तिवेतनातून अस्मिताचा चरितार्थ चालविण्यास सरकारने परवानगी द्यावी.

गेली ४२ वर्षे माझी मुलगी एकाच खुर्चीत लॉकडाऊनचा अनुभव घेत आहे. दीर्घ कालावधीनंतर तिला व आम्हांला ती पुन्हा उभी राहील, हा आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनीही २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळून आपल्यासह इतरांच्याही जिवाला जपले पाहिजे.- रजनी मारुलकर, अस्मिताची आई 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर