शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

CoronaVirus Lockdown : ‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊन, अस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:46 IST

एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊनअस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी

सचिन भोसले कोल्हापूर : एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.अशा लॉकडाऊन झालेल्या साने गुरुजी वसाहत येथील क्रशर चौकालगतच्या एका कॉलनीतील ‘अस्मिता’ची कहाणी काही औरच आहे.अस्मिता ही रजनी व पंडित मारुलकर यांची एकुलती एक कन्या. जन्म १९७६ सालचा. नियमित मुलांसारखी ती बागडत होती. अचानकपणे १९७९ साली तिचे चालणे, बोलणे बंद झाले. ती केवळ हुंकार देऊ लागली. त्यानंतर आजतागायत ४२ वर्षांचा कालावधी गेला; ती अजूनही एका खुर्चीत अक्षरश: ‘लॉकडाऊन’ आहे.

 तिच्या खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व सोपस्कर आईवडील करतात. त्यांची वयेही बघितली तर अनुक्रमे ७५ आणि ८० अशी आहेत. दोघेही न कंटाळता, केवळ ती पुन्हा पायावर उभी राहावी, या आशेने ही सेवा करीत आहेत. मारुलकर दाम्पत्याचा एकच कार्यक्रम म्हणजे अस्मिता पुन्हा उभी व्हावी, या आशेवर तिची एकसारखी सेवा, तीही न थकता करीत राहणे. दोघांनी तर कधी नातेवाइकांचे किंवा जवळच्या मंडळींचे लग्न, समारंभ, आदी पाहिलेलेच नाहीत. नातवंडांना खेळवायच्या वयात त्यांना मुलीला उचलावे लागत आहे. घरात काही बाजार वगैरे आणायचे म्हटले तर एकाला बाहेर जावे लागते, तर एकाला तिच्याबरोबर राहावे लागते.

गेल्या ४२ वर्षांनंतर मारुलकर पती-पत्नी आजही थकलेले नाहीत. केवळ त्यांची वये वाढली आहेत. त्यांचा उत्साह तर तरुण पिढीला लाजविणारा आहे. अस्मिता तर गेल्या ४२ वर्षांपासून एका खुर्चीत लॉकडाऊन आहे. अशा पद्धतीने लॉकडाऊन झालेल्या अस्मिताला आपण बरे होऊ, असा आशेचा किरण आहे. मग लोकांना २१ दिवसांचा लॉकडाऊन सहन का होईना?अस्मिताचे वडील पंडित मारुलकर हे शिवाजी विद्यापीठातून उपकुलसचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तिवेतन मिळते. त्यांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे त्यांच्या व पत्नी रजनी यांच्या पश्चात त्यांच्या निवृत्तिवेतनातून अस्मिताचा चरितार्थ चालविण्यास सरकारने परवानगी द्यावी.

गेली ४२ वर्षे माझी मुलगी एकाच खुर्चीत लॉकडाऊनचा अनुभव घेत आहे. दीर्घ कालावधीनंतर तिला व आम्हांला ती पुन्हा उभी राहील, हा आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनीही २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळून आपल्यासह इतरांच्याही जिवाला जपले पाहिजे.- रजनी मारुलकर, अस्मिताची आई 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर