शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर, जवानांला राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:10 IST

आपला जीव आणि पोटात वाढणाऱ्या अंकुरास महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढल्याबद्दल सहा महिन्याच्या गरोदर महिलेने भारतील लष्काराच्या अधिकाऱ्यांस राखी बांधून जवानांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केला. महापुराच्या संकटाचा मनावरील ताण हालका होताच महिलेने टी. ए. बटालियन येथे जाऊन बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आॅफीसर इन कमांड ललितकुमार यांना राखी बांधली आणि त्यांचे आभार मानले.

ठळक मुद्देराखी बांधून तिने व्यक्त केली जवानांबद्दल कृतज्ञता ना नात्यातील ना गोत्यातील तरीही रक्षा बंधन भावनिक

कोल्हापूर : आपला जीव आणि पोटात वाढणाऱ्या अंकुरास महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढल्याबद्दल सहा महिन्याच्या गरोदर महिलेने भारतील लष्काराच्या अधिकाऱ्यांस राखी बांधून जवानांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केला. महापुराच्या संकटाचा मनावरील ताण हालका होताच महिलेने टी. ए. बटालियन येथे जाऊन बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आॅफीसर इन कमांड ललितकुमार यांना राखी बांधली आणि त्यांचे आभार मानले.प्रयाग चिखली, आंबेवाडी येथे मंगळवारी (दि. ६ आॅगस्ट) सकाळपासून पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी वाढायला लागली तशी आंबेवाडी ग्रामस्थांची भितीने गाळण उडाली. प्रत्येक व्यक्ती हताश होऊन देवाची याचना करत होती.जातपात, गरीब-श्रीमंत यातील दरी एक दणक्यात दूर झाली आणि सगळेच स्वत:ला वाचवण्यासाठी त्या विधात्याची विनवणी करु लागले. मदत काही पोहचत नव्हती. मंगळवारी दुपारनंतर लष्काराची एक बोट नजरेस पडली आणि साक्षात तो विधाताच मदतीला आला अशी भावना निर्माण झाली.आंबेवाडी येथे राहणाऱ्या सई संग्राम अतितकर या सहा महिन्याच्या गरोदर महिलेच्या कुुटुंबाला महापूराच्या पाण्याचा फटका बसला. घरातून बाहेर कसे पडायचे या विवंचनेत कुटंबिय होते. घरातील सगळेच काळजीत होते. पाणी वाढेल तसे सगळ्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकायला लागले. काय करायचे, कसे होणार या काळजीने त्रस्त असलेल्या कुटुंबाच्या मदतीला लष्काराचे जवान धावून गेले.

सई तसेच त्यांचे पती संग्राम यांच्यासह सर्वांना बोटीत घेतले आणि शिवाजी पूलावर आणून सोडले. मानसिक धक्कयातून सावरल्यानंतर सई यांनी नुकतेच टी. ए. बटालियन येथे जाऊन त्या जवानांना राखी बांधायची होती. त्या तेथे गेल्या. परंतु त्यांचा बचाव करणारे जवान शिरोळला गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही. म्हणून बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जीओएस ललितकुमार यांना राखी बांधून जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ना नात्यातील ना गोत्यातील तरीही रक्षा बंधनाच्या भावनिक कार्यक्रमाने जवान व सामान्य नागरीक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ केले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर