शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर, जवानांला राखी बांधून व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:10 IST

आपला जीव आणि पोटात वाढणाऱ्या अंकुरास महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढल्याबद्दल सहा महिन्याच्या गरोदर महिलेने भारतील लष्काराच्या अधिकाऱ्यांस राखी बांधून जवानांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केला. महापुराच्या संकटाचा मनावरील ताण हालका होताच महिलेने टी. ए. बटालियन येथे जाऊन बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आॅफीसर इन कमांड ललितकुमार यांना राखी बांधली आणि त्यांचे आभार मानले.

ठळक मुद्देराखी बांधून तिने व्यक्त केली जवानांबद्दल कृतज्ञता ना नात्यातील ना गोत्यातील तरीही रक्षा बंधन भावनिक

कोल्हापूर : आपला जीव आणि पोटात वाढणाऱ्या अंकुरास महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढल्याबद्दल सहा महिन्याच्या गरोदर महिलेने भारतील लष्काराच्या अधिकाऱ्यांस राखी बांधून जवानांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केला. महापुराच्या संकटाचा मनावरील ताण हालका होताच महिलेने टी. ए. बटालियन येथे जाऊन बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आॅफीसर इन कमांड ललितकुमार यांना राखी बांधली आणि त्यांचे आभार मानले.प्रयाग चिखली, आंबेवाडी येथे मंगळवारी (दि. ६ आॅगस्ट) सकाळपासून पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी वाढायला लागली तशी आंबेवाडी ग्रामस्थांची भितीने गाळण उडाली. प्रत्येक व्यक्ती हताश होऊन देवाची याचना करत होती.जातपात, गरीब-श्रीमंत यातील दरी एक दणक्यात दूर झाली आणि सगळेच स्वत:ला वाचवण्यासाठी त्या विधात्याची विनवणी करु लागले. मदत काही पोहचत नव्हती. मंगळवारी दुपारनंतर लष्काराची एक बोट नजरेस पडली आणि साक्षात तो विधाताच मदतीला आला अशी भावना निर्माण झाली.आंबेवाडी येथे राहणाऱ्या सई संग्राम अतितकर या सहा महिन्याच्या गरोदर महिलेच्या कुुटुंबाला महापूराच्या पाण्याचा फटका बसला. घरातून बाहेर कसे पडायचे या विवंचनेत कुटंबिय होते. घरातील सगळेच काळजीत होते. पाणी वाढेल तसे सगळ्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकायला लागले. काय करायचे, कसे होणार या काळजीने त्रस्त असलेल्या कुटुंबाच्या मदतीला लष्काराचे जवान धावून गेले.

सई तसेच त्यांचे पती संग्राम यांच्यासह सर्वांना बोटीत घेतले आणि शिवाजी पूलावर आणून सोडले. मानसिक धक्कयातून सावरल्यानंतर सई यांनी नुकतेच टी. ए. बटालियन येथे जाऊन त्या जवानांना राखी बांधायची होती. त्या तेथे गेल्या. परंतु त्यांचा बचाव करणारे जवान शिरोळला गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही. म्हणून बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जीओएस ललितकुमार यांना राखी बांधून जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ना नात्यातील ना गोत्यातील तरीही रक्षा बंधनाच्या भावनिक कार्यक्रमाने जवान व सामान्य नागरीक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ केले.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर