शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:39 IST

‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही.

कोल्हापूर : केंद्र सरकारविरोधात देशपातळीवर लढा देणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्या सर्वच संघटनांना त्यांच्यातील गैरसमज दूर करून एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेट्टी यांचे गैरसमज दूर करणार असल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेत रविवारी पवार यांना राजू शेट्टी नाराज असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही नाराजी दूर केली जाईल, असे सांगितले. पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा वेळी देशभरातील शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. राजू शेट्टी यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीतून कोणी बाहेर जावं असे आम्हाला वाटत नाही.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांत द्यायला विरोध होत असल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी सांगितले की, ‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही. त्यामुळे साठे करून ठेवावे लागतात. जर एकरकमी एफआरपी द्यायची झाली तर त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मग अशा कर्जाचे व्याज शेतकऱ्यांवर पडते. त्याचा परिणाम उसाच्या किमतीवर पडतो. म्हणूनच जर कोणी एफआरपी वेगवेगळी करून देत असेल तर त्याला विरोध करायचे कारण नाही.’

भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने हिंदुत्वापेक्षा देशात महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याकडे पाहायला केंद्र सरकार तयार नाही. नागरिकांना यातना होत असतानाही सरकार दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जाती जातीत, धर्माधर्मात, भाषेभाषेत मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे; पण कांद्याच्या भाववाढीवरसुद्धा सरकारे पडल्याची उदाहरणे आहेत.’

राज ठाकरेंमध्ये गुणात्मक बदल

राज ठाकरे भूमिगत असतात. कधी तरी मेळावा घेऊन बाहेर येऊन राजकारणात पुन्हा सक्रिय होतात. आधी ते मोदींची स्तुस्ती करायचे. आता टीका करतात. त्यांच्यात गुणात्मक बदल झाल्याचे दिसून येते, असे पवार म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार