शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:39 IST

‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही.

कोल्हापूर : केंद्र सरकारविरोधात देशपातळीवर लढा देणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्या सर्वच संघटनांना त्यांच्यातील गैरसमज दूर करून एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेट्टी यांचे गैरसमज दूर करणार असल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेत रविवारी पवार यांना राजू शेट्टी नाराज असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही नाराजी दूर केली जाईल, असे सांगितले. पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा वेळी देशभरातील शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. राजू शेट्टी यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीतून कोणी बाहेर जावं असे आम्हाला वाटत नाही.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांत द्यायला विरोध होत असल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी सांगितले की, ‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही. त्यामुळे साठे करून ठेवावे लागतात. जर एकरकमी एफआरपी द्यायची झाली तर त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मग अशा कर्जाचे व्याज शेतकऱ्यांवर पडते. त्याचा परिणाम उसाच्या किमतीवर पडतो. म्हणूनच जर कोणी एफआरपी वेगवेगळी करून देत असेल तर त्याला विरोध करायचे कारण नाही.’

भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने हिंदुत्वापेक्षा देशात महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याकडे पाहायला केंद्र सरकार तयार नाही. नागरिकांना यातना होत असतानाही सरकार दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जाती जातीत, धर्माधर्मात, भाषेभाषेत मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे; पण कांद्याच्या भाववाढीवरसुद्धा सरकारे पडल्याची उदाहरणे आहेत.’

राज ठाकरेंमध्ये गुणात्मक बदल

राज ठाकरे भूमिगत असतात. कधी तरी मेळावा घेऊन बाहेर येऊन राजकारणात पुन्हा सक्रिय होतात. आधी ते मोदींची स्तुस्ती करायचे. आता टीका करतात. त्यांच्यात गुणात्मक बदल झाल्याचे दिसून येते, असे पवार म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार