शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:39 IST

‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही.

कोल्हापूर : केंद्र सरकारविरोधात देशपातळीवर लढा देणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्या सर्वच संघटनांना त्यांच्यातील गैरसमज दूर करून एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेट्टी यांचे गैरसमज दूर करणार असल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेत रविवारी पवार यांना राजू शेट्टी नाराज असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही नाराजी दूर केली जाईल, असे सांगितले. पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा वेळी देशभरातील शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. राजू शेट्टी यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीतून कोणी बाहेर जावं असे आम्हाला वाटत नाही.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांत द्यायला विरोध होत असल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी सांगितले की, ‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही. त्यामुळे साठे करून ठेवावे लागतात. जर एकरकमी एफआरपी द्यायची झाली तर त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मग अशा कर्जाचे व्याज शेतकऱ्यांवर पडते. त्याचा परिणाम उसाच्या किमतीवर पडतो. म्हणूनच जर कोणी एफआरपी वेगवेगळी करून देत असेल तर त्याला विरोध करायचे कारण नाही.’

भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने हिंदुत्वापेक्षा देशात महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याकडे पाहायला केंद्र सरकार तयार नाही. नागरिकांना यातना होत असतानाही सरकार दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जाती जातीत, धर्माधर्मात, भाषेभाषेत मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे; पण कांद्याच्या भाववाढीवरसुद्धा सरकारे पडल्याची उदाहरणे आहेत.’

राज ठाकरेंमध्ये गुणात्मक बदल

राज ठाकरे भूमिगत असतात. कधी तरी मेळावा घेऊन बाहेर येऊन राजकारणात पुन्हा सक्रिय होतात. आधी ते मोदींची स्तुस्ती करायचे. आता टीका करतात. त्यांच्यात गुणात्मक बदल झाल्याचे दिसून येते, असे पवार म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार