शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:39 IST

‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही.

कोल्हापूर : केंद्र सरकारविरोधात देशपातळीवर लढा देणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्या सर्वच संघटनांना त्यांच्यातील गैरसमज दूर करून एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेट्टी यांचे गैरसमज दूर करणार असल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेत रविवारी पवार यांना राजू शेट्टी नाराज असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही नाराजी दूर केली जाईल, असे सांगितले. पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा वेळी देशभरातील शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. राजू शेट्टी यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीतून कोणी बाहेर जावं असे आम्हाला वाटत नाही.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांत द्यायला विरोध होत असल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी सांगितले की, ‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही. त्यामुळे साठे करून ठेवावे लागतात. जर एकरकमी एफआरपी द्यायची झाली तर त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मग अशा कर्जाचे व्याज शेतकऱ्यांवर पडते. त्याचा परिणाम उसाच्या किमतीवर पडतो. म्हणूनच जर कोणी एफआरपी वेगवेगळी करून देत असेल तर त्याला विरोध करायचे कारण नाही.’

भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने हिंदुत्वापेक्षा देशात महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याकडे पाहायला केंद्र सरकार तयार नाही. नागरिकांना यातना होत असतानाही सरकार दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जाती जातीत, धर्माधर्मात, भाषेभाषेत मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे; पण कांद्याच्या भाववाढीवरसुद्धा सरकारे पडल्याची उदाहरणे आहेत.’

राज ठाकरेंमध्ये गुणात्मक बदल

राज ठाकरे भूमिगत असतात. कधी तरी मेळावा घेऊन बाहेर येऊन राजकारणात पुन्हा सक्रिय होतात. आधी ते मोदींची स्तुस्ती करायचे. आता टीका करतात. त्यांच्यात गुणात्मक बदल झाल्याचे दिसून येते, असे पवार म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार