शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

“समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 20:59 IST

Sharad Pawar News: लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही, याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवारांनी केले.

Sharad Pawar News: संकट आल्यावर पळून जाणे, लाचारी स्वीकारणे हा कागलचा इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर समरजितसिंह घाटगेंना विधानसभेवर पाठवा. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, असा शब्द शरद पवार यांनी दिला. समरजितसिंह घाटगे यांनी अधिकृतपणे शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केला. यावेळी गैबी चौकात शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

शरद पवार पुढे म्हणाले की, मोठ्या संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिले होते, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही, तसा इथला इतिहास नाही. ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिले. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली. 

दरम्यान, सत्तेसाठी जर कुणी गायब झालं असेल तर त्याला शाहू महाराजांच्या विचाराच्या कोल्हापूरकरांनी धडा शिकवला, कधीही लाचार होणार नाही असा संदेश दिला. तरुणांची कष्ट करण्याची तयारी आहे पण त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून रोज त्याच्या बातम्या येतात. लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. पण केंद्र सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नाही. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला, वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला, असे सांगितले अशांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असे आवाहन शरद पवारांनी केले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे