शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

By विश्वास पाटील | Updated: December 11, 2022 18:11 IST

शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई कारखान्यास व  शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कोल्हापूर: राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या दोन नेत्यांच्या कारखान्यांना शासनाने अगोदर लाभ दिला आहे व मग त्याचे निकष निश्चित करून प्रस्ताव मागवल्याचे प्रकरण समोर आले आहे. शासनाने शुक्रवारी त्यासंबंधीचा शासनादेश काढला असून, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण (जि. सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यास व भाजपचे किल्लारी (जि.लातूर)चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांचे, तर पवार हे उपमुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जातात.

कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० वरून २५०० करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचे निकष या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या निकषानुसार जे कारखाने पात्र ठरतील त्यांना भागभांडवल द्यायला हवे; परंतु इथे मात्र उलटेच झाले आहे. ज्या आदेशामध्ये निकष निश्चित केले आहेत, त्याच आदेशान्वये दोन कारखान्यांना आर्थिक मदत दिली आहे. याचा अर्थ या दोन कारखान्यांना सरकारला मदत द्यायचीच होती. ती त्यांनाच दिल्यावर ओरड होईल म्हणून त्यांना अगोदर मदत करून त्याला जोडूनच इतरांना मदतीचा शासन आदेश एकत्रितच काढला आहे. राज्यात सध्या १०० सहकारी व ९९ खासगी कारखाने सुरू आहेत. त्यापैकी १५ कारखाने हे १२५० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे आहेत. गाळप क्षमता कमी असल्याने साखर उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च कमी या दूष्टचक्रात हे कारखाने सापडले आहेत. जुनाट यंत्रसामग्री, भरमसाठ कामगार भरती, भ्रष्टाचार, अपुरे खेळते भांडवल हीदेखील त्याची कारणे आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखान्यांना शासकीय भागभांडवल देणे बंद केले. तो निर्णय बदलून आता कारखान्यांना मदत दिली जात आहे.

सहा निकषभागभांडवल देण्यासाठी सहा निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा विचार केल्यास पंधरापैकी फार कमी कारखान्यांना या योजनेचा लाभ होईल. हे कारखाने निकषामध्ये बसतात की नाही याची छाननी करण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर आहे..मग पाटण व किल्लारी कारखान्यांचे निकष अगोदरच कुणी तपासले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शंभूराज यांचे कर्तृत्व..लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना स्थापन होऊन पन्नास वर्षे झाली. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे या कारखान्याची सूत्रे वयाच्या १८ व्या वर्षी आली. गेली तीन तपे ते हा कारखाना चालवतात; परंतू त्यांना इतक्या वर्षांत त्याची गाळप क्षमता १ टनानेही वाढवता आली नाही. पाटणला ऊस कमी असला तरी कराड तालुका उसाचे आगर आहे; परंतु त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलेले नाही. उंब्रजचा जयवंत शुगर हा खासगी कारखाना भोसले कुटुंबीयांनी अल्पावधीतच दणक्यात चालवला आहे आणि मंत्री देसाई आता सरकारी भांडवल मिळतेय म्हणून गाळप क्षमता वाढवत आहेत.

किल्लारीचा कारखाना बंदचकिल्लारीचा कारखाना नऊ वर्षांपासून बंद आहे. त्यावर सध्या प्रशासक आहे. तो सुरू व्हावा यासाठी आमदार पवार प्रयत्नशील आहेत. तो त्यांच्या मतदारसंघातील कारखाना आहे.

  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदेsatara-acसाताराkolhapurकोल्हापूर