शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

By विश्वास पाटील | Updated: December 11, 2022 18:11 IST

शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई कारखान्यास व  शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कोल्हापूर: राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या दोन नेत्यांच्या कारखान्यांना शासनाने अगोदर लाभ दिला आहे व मग त्याचे निकष निश्चित करून प्रस्ताव मागवल्याचे प्रकरण समोर आले आहे. शासनाने शुक्रवारी त्यासंबंधीचा शासनादेश काढला असून, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण (जि. सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यास व भाजपचे किल्लारी (जि.लातूर)चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांचे, तर पवार हे उपमुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जातात.

कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० वरून २५०० करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचे निकष या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या निकषानुसार जे कारखाने पात्र ठरतील त्यांना भागभांडवल द्यायला हवे; परंतु इथे मात्र उलटेच झाले आहे. ज्या आदेशामध्ये निकष निश्चित केले आहेत, त्याच आदेशान्वये दोन कारखान्यांना आर्थिक मदत दिली आहे. याचा अर्थ या दोन कारखान्यांना सरकारला मदत द्यायचीच होती. ती त्यांनाच दिल्यावर ओरड होईल म्हणून त्यांना अगोदर मदत करून त्याला जोडूनच इतरांना मदतीचा शासन आदेश एकत्रितच काढला आहे. राज्यात सध्या १०० सहकारी व ९९ खासगी कारखाने सुरू आहेत. त्यापैकी १५ कारखाने हे १२५० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे आहेत. गाळप क्षमता कमी असल्याने साखर उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च कमी या दूष्टचक्रात हे कारखाने सापडले आहेत. जुनाट यंत्रसामग्री, भरमसाठ कामगार भरती, भ्रष्टाचार, अपुरे खेळते भांडवल हीदेखील त्याची कारणे आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखान्यांना शासकीय भागभांडवल देणे बंद केले. तो निर्णय बदलून आता कारखान्यांना मदत दिली जात आहे.

सहा निकषभागभांडवल देण्यासाठी सहा निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा विचार केल्यास पंधरापैकी फार कमी कारखान्यांना या योजनेचा लाभ होईल. हे कारखाने निकषामध्ये बसतात की नाही याची छाननी करण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर आहे..मग पाटण व किल्लारी कारखान्यांचे निकष अगोदरच कुणी तपासले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शंभूराज यांचे कर्तृत्व..लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना स्थापन होऊन पन्नास वर्षे झाली. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे या कारखान्याची सूत्रे वयाच्या १८ व्या वर्षी आली. गेली तीन तपे ते हा कारखाना चालवतात; परंतू त्यांना इतक्या वर्षांत त्याची गाळप क्षमता १ टनानेही वाढवता आली नाही. पाटणला ऊस कमी असला तरी कराड तालुका उसाचे आगर आहे; परंतु त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलेले नाही. उंब्रजचा जयवंत शुगर हा खासगी कारखाना भोसले कुटुंबीयांनी अल्पावधीतच दणक्यात चालवला आहे आणि मंत्री देसाई आता सरकारी भांडवल मिळतेय म्हणून गाळप क्षमता वाढवत आहेत.

किल्लारीचा कारखाना बंदचकिल्लारीचा कारखाना नऊ वर्षांपासून बंद आहे. त्यावर सध्या प्रशासक आहे. तो सुरू व्हावा यासाठी आमदार पवार प्रयत्नशील आहेत. तो त्यांच्या मतदारसंघातील कारखाना आहे.

  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदेsatara-acसाताराkolhapurकोल्हापूर