शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कारखान्यांना मदतीचे आधी ठरले लाभार्थी; मग धोरण, सत्तारूढ दोन आमदारांना लाभ; पाटण व किल्लारी कारखान्यास ३४ कोटी मिळणार

By विश्वास पाटील | Updated: December 11, 2022 18:11 IST

शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई कारखान्यास व  शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

कोल्हापूर: राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या दोन नेत्यांच्या कारखान्यांना शासनाने अगोदर लाभ दिला आहे व मग त्याचे निकष निश्चित करून प्रस्ताव मागवल्याचे प्रकरण समोर आले आहे. शासनाने शुक्रवारी त्यासंबंधीचा शासनादेश काढला असून, त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण (जि. सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यास व भाजपचे किल्लारी (जि.लातूर)चे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील शेतकरी साखर कारखान्यास ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांचे, तर पवार हे उपमुख्यमंत्र्यांचे उजवे हात मानले जातात.

कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० वरून २५०० करण्यासाठी शासकीय भागभांडवल देण्याचे निकष या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या निकषानुसार जे कारखाने पात्र ठरतील त्यांना भागभांडवल द्यायला हवे; परंतु इथे मात्र उलटेच झाले आहे. ज्या आदेशामध्ये निकष निश्चित केले आहेत, त्याच आदेशान्वये दोन कारखान्यांना आर्थिक मदत दिली आहे. याचा अर्थ या दोन कारखान्यांना सरकारला मदत द्यायचीच होती. ती त्यांनाच दिल्यावर ओरड होईल म्हणून त्यांना अगोदर मदत करून त्याला जोडूनच इतरांना मदतीचा शासन आदेश एकत्रितच काढला आहे. राज्यात सध्या १०० सहकारी व ९९ खासगी कारखाने सुरू आहेत. त्यापैकी १५ कारखाने हे १२५० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे आहेत. गाळप क्षमता कमी असल्याने साखर उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च कमी या दूष्टचक्रात हे कारखाने सापडले आहेत. जुनाट यंत्रसामग्री, भरमसाठ कामगार भरती, भ्रष्टाचार, अपुरे खेळते भांडवल हीदेखील त्याची कारणे आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखान्यांना शासकीय भागभांडवल देणे बंद केले. तो निर्णय बदलून आता कारखान्यांना मदत दिली जात आहे.

सहा निकषभागभांडवल देण्यासाठी सहा निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा विचार केल्यास पंधरापैकी फार कमी कारखान्यांना या योजनेचा लाभ होईल. हे कारखाने निकषामध्ये बसतात की नाही याची छाननी करण्याची जबाबदारी साखर आयुक्तांवर आहे..मग पाटण व किल्लारी कारखान्यांचे निकष अगोदरच कुणी तपासले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शंभूराज यांचे कर्तृत्व..लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना स्थापन होऊन पन्नास वर्षे झाली. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे या कारखान्याची सूत्रे वयाच्या १८ व्या वर्षी आली. गेली तीन तपे ते हा कारखाना चालवतात; परंतू त्यांना इतक्या वर्षांत त्याची गाळप क्षमता १ टनानेही वाढवता आली नाही. पाटणला ऊस कमी असला तरी कराड तालुका उसाचे आगर आहे; परंतु त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलेले नाही. उंब्रजचा जयवंत शुगर हा खासगी कारखाना भोसले कुटुंबीयांनी अल्पावधीतच दणक्यात चालवला आहे आणि मंत्री देसाई आता सरकारी भांडवल मिळतेय म्हणून गाळप क्षमता वाढवत आहेत.

किल्लारीचा कारखाना बंदचकिल्लारीचा कारखाना नऊ वर्षांपासून बंद आहे. त्यावर सध्या प्रशासक आहे. तो सुरू व्हावा यासाठी आमदार पवार प्रयत्नशील आहेत. तो त्यांच्या मतदारसंघातील कारखाना आहे.

  

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदेsatara-acसाताराkolhapurकोल्हापूर