शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेने शाहू छत्रपती गलबलले, हिंसाचारग्रस्तांना आधार देण्यासाठी घेतला पुढाकार 

By भारत चव्हाण | Updated: July 17, 2024 13:00 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने खासदार शाहू ...

भारत चव्हाण

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने खासदार शाहू छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ असल्याचे पहायला मिळाले. दंगलीचे वृत्त कळताच मुंबईला जात असलेले शाहू छत्रपती पुण्यातून कोल्हापूरला परतले आणि प्रत्येक घटनेवर त्यांनी लक्ष ठेवत हिंसाचारग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. मंगळवारी त्यांनी गजापूर येथे जाऊन नागरिकांशी संवाद साधत एक मुलीच्या अंगावर स्वत:चे जॅकेटही घातले. या कृतीतून त्यांच्या हळव्या मनाची प्रचिती आली.विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर शाहू छत्रपती यांची भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी संयमाने घ्यावे, अशीच होती. हिंसाचार घडण्यापूर्वी पाच दिवस आधी शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना फोन केला. ‘या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्या. समाजमाध्यमावरून आवाहन केले जात आहे. काही तरी वेगळे घडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा’, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीराजे यांच्याशी फोनवर संपर्क करून चर्चेला येण्याचे आवाहन केले. पण, संभाजीराजे यांनी ते ऐकले नाही. शेवटी जिल्हाधिकारी येडगे न्यू पॅलेसवर गेले. त्यांनी तुम्हीच संभाजीराजेंना समजवा, असे सांगितले. परंतु, संभाजीराजे तेथे नव्हते. म्हणून शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंशी फोनवर चर्चा केली. दीड वर्षे मी मागणी करतोय कोणीच काही करत नाही, मला कोणी तरी शब्द द्यावा, असे संभाजीराजे सांगत होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचा विषय झाला, परंतु पुढे काही झाले नाही.मुकेश अंबानी यांच्या पुत्राच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी शाहू छत्रपती मुंबईला जात होते. परंतु, वाटेत त्यांना विशाळगड हिंसाचाराची बातमी समजली. त्यावेळी त्यांनी पुण्यातूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी ते पॅलेसवर पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली, काही व्हिडीओ पाहिले तेव्हापासून शाहू छत्रपती अस्वस्थ झाले. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन परिस्थितीची माहिती करून घेतली.सोमवारी सकाळी त्यांनी सर्वप्रथम या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, काही सहकाऱ्यांनी त्यांना परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, उद्या जाऊया, असे सांगून थांबविले. मनात प्रचंड घालमेल सुरू असल्याने त्यांनी रविवारी दुपारचे जेवणही घेतले नाही. त्यांच्या सोबत असणाऱ्या मालोजीराजे, मधुरिमाराजे, व्ही. बी. पाटील यांनी त्यांना काही तरी खाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनी हलकासा नाष्टा घेतला. सायंकाळी इंडिया आघाडीची बैठक बोलाविली.मंगळवारी त्यांनी विशाळगडावर जात असताना सोबत अन्नधान्य घेऊन गेले. महिला, पुरुष यांच्याशी जवळून संवाद साधत त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग जाणून घेतला. हा दुर्दैवी प्रसंग त्या कुटुंबावर नाही तर आपल्या स्वत:वरच ओढवलेला आहे, अशा विषन्न मनाने ते महिलांचे म्हणणे जाणून घेत होते. सगळा प्रकार ऐकून शाहू छत्रपती गलबलून गेले. या घटनेला आपल्या घरातील एका सदस्याच्या आंदोलनामुळे हे घडले याचे अतीव दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पण, सर्व समाज आपला आहे, त्यांचे दु:ख हे आपले आहे, असे समजून त्यांनी हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती