शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘शेकाप’चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, जाब विचारु : संपतराव पवार-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 16:52 IST

कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.

ठळक मुद्देकर्जमाफीवरुन फसवणूक करणारे हे सरकार नादान : संपतराव पवार-पाटील विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने, आंदोलकांनी मारला ठिय्या

कोल्हापूर : कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.

दुपारी एकच्या सुमारास टेंबे रोडवरील ‘शेकाप’ कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. ‘कष्टाचा राजा शेतकरी...त्याला करु नका भिकारी’, ‘नको आम्हाला डिजिटलयाझेशन...आम्हाला हवा शेतकरीलायझेशन’, ‘आम्ही लाभार्थी...गॅस-वीज दरवाढीचे आणि लोड शेडींगचे’ अशा आशयाचे फलक लक्ष वेधत होते. घोषणाबाजी करत हा मोर्चा बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी ठिय्या मारला.यावेळी संपतराव पवार-पाटील म्हणाले, कर्जमाफीबाबत सरकारने घोषणाबाजी करून गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या फसव्या कर्जमाफीचा काही लाभ होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.

याचबरोबर शेतमालाच्या खरेदीसाठी शासनाने उभारलेली तुटपुंजी खरेदी केंद्रे ही व्यापाऱ्यांची बटीक असल्याचे दिसत आहेत. शेतीपंप वीजधारकांच्या वीजदरात सातत्याने सरकार वाढ करीत आहे. शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी यांना ६० वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, ही मागणीही धूळ खात पडली आहे.आंदोलनात अशोकराव पवार-पाटील, भारत पाटील, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, दत्तात्रय पाटील, जनार्दन जाधव, बाबूराव कदम, अमित कांबळे, शिवाजी साळुंखे, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, सुभाष झेंडे, चंद्रकांत बागडी, अजित देसाई, एकनाथ पाटील, राजू देशमाने, शाहीर रंगराव पाटील, मधुकर हरेल, संतराम पाटील आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदारFarmerशेतकरी