शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Kolhapur News: काठावरील गावांचे सांडपाणी पंचगंगेत, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 13:45 IST

कसबा बावडा- शिये पूल दरम्यान पंचगंगा नदीत मासे मृत आढळून आले होते

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याच्या खालील व वरील बाजूने तसेच नदीकाठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीवेळी स्पष्ट झाले. सोमवार व मंगळवारी ही पाहणी करण्यात आली, तसेच जेथे सांडपाणी मिसळते तेथील पाण्याचे नमूने रासायनिक पृथ्थकरणासाठी घेण्यात आले.प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे संस्थापक दिलीप देसाई यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने पंचगंगा नदीकाठाने कसबा बावडा ते शिये पूल येथे पाहणी करण्यात आली. सोमवार व मंगळवारी ही पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.पाहणी दरम्यान सोमवारी कसबा बावडा- शिये पूल दरम्यान पंचगंगा नदीत मध्यम आकाराचे मासे मृत झाल्याचे आढळून आहे.

पंचगंगा नदीतील पाण्याचा नमुना पृथ्थकरणासाठी घेण्यात आला. मंगळवारी पाहणी दरम्यान कारखान्याच्या प्रक्रिया केलेली सांडपाण्याची पाईप लाईन (नागाव गावास जाणारी) एअर व्हॉल्व्ह थोड्या प्रमाणात लिकेज असल्याचे आढळून आले. राजाराम बंधाऱ्याच्या वरील व खालील बाजूने कसबा बावडा परिसरातून येणारे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे आढळून आले.महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची दुधाळी व कसबा बावडा येथे पाहणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही ठिकाणाहून प्रक्रियायुक्त सांडपाणी सोडत असल्याचे दिसून आले. नदीकाठावरील गावामधून काही प्रमाणात घरगुती सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरभड यांनी याबाबतचा पाहणी अहवाल तयार केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण