शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पंचाहत्तर टक्के भागाला पाणीपुरवठा, पूर्ण क्षमतेने होणार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:40 IST

अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देपंचाहत्तर टक्के भागाला पाणीपुरवठाशुक्रवारपासून शहराचा पूर्ण क्षमतेने होणार पाणीपुरवठा

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या १२ दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता बरीच सुधारणा झाली. बुधवारी बालिंगा, नागदेववाडी, कसबा बावडा उपसा केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. शिंगणापूर येथील पुईखडीचे दोन तसेच कसबा बावड्याचे दोन मोटरी सुरू होत्या. पुईखडीसाठीची आणखी एक मोटार बुधवारी रात्री साडेदहा वाजता जोडण्यात आली. उर्वरित मोटार ही आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत जोडली की १०० टक्के उपसा व जलशुद्धिकरण यंत्रणा कार्यान्वित होईल.शहरातील ए, बी, सी व डी भागांना तसेच कसबा बावडा ते कावळा नाका परिसरातील १८ प्रभागांना बुधवारी अपुरा व कमी दाबाने पाणी मिळाले. मात्र कावळा नाका टाकी व राजारामपुरी टाकीवर अवलंबून असलेल्या शिवाजी पार्क, राजारामपुरी सर्व गल्ल्या, रुईकर कॉलनी, भोसलेवाडी, कदमवाडी, शाहूपुरीचा काही भाग येथे पाणी मिळालेले नाही. उद्या, शुक्रवारी या भागास पाणी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.यांत्रिकी विभागाचे उपअभियंता रामदास गायकवाड गेल्या १२ दिवसांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी झटत आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच ‘स्मॅक’च्या पदाधिकाऱ्यांनीही मोठी मदत केली. रेनबो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे काशीनाथ शिंदे यांनीही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विद्युत सल्लागार असलेल्या शिंदे यांची झालेली मदत मोठी असून त्यांच्याशिवाय पाणीपुरवठा इतक्या कमी कालावधीत सुरू होणे अशक्य होते, असे गायकवाड यांनी सांगितले.शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे अजूनही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथून १७८, कसबा बावडा येथून ५३, तर राजारामपुरी येथून २८ असे २५९ टॅँकर पाणी पुरविण्यात आले. 

 

टॅग्स :WaterपाणीKolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिका