शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पंचाहत्तर टक्के भागाला पाणीपुरवठा, पूर्ण क्षमतेने होणार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:40 IST

अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देपंचाहत्तर टक्के भागाला पाणीपुरवठाशुक्रवारपासून शहराचा पूर्ण क्षमतेने होणार पाणीपुरवठा

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.शहराचा खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या १२ दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता बरीच सुधारणा झाली. बुधवारी बालिंगा, नागदेववाडी, कसबा बावडा उपसा केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. शिंगणापूर येथील पुईखडीचे दोन तसेच कसबा बावड्याचे दोन मोटरी सुरू होत्या. पुईखडीसाठीची आणखी एक मोटार बुधवारी रात्री साडेदहा वाजता जोडण्यात आली. उर्वरित मोटार ही आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत जोडली की १०० टक्के उपसा व जलशुद्धिकरण यंत्रणा कार्यान्वित होईल.शहरातील ए, बी, सी व डी भागांना तसेच कसबा बावडा ते कावळा नाका परिसरातील १८ प्रभागांना बुधवारी अपुरा व कमी दाबाने पाणी मिळाले. मात्र कावळा नाका टाकी व राजारामपुरी टाकीवर अवलंबून असलेल्या शिवाजी पार्क, राजारामपुरी सर्व गल्ल्या, रुईकर कॉलनी, भोसलेवाडी, कदमवाडी, शाहूपुरीचा काही भाग येथे पाणी मिळालेले नाही. उद्या, शुक्रवारी या भागास पाणी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.यांत्रिकी विभागाचे उपअभियंता रामदास गायकवाड गेल्या १२ दिवसांपासून यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी झटत आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच ‘स्मॅक’च्या पदाधिकाऱ्यांनीही मोठी मदत केली. रेनबो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे काशीनाथ शिंदे यांनीही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विद्युत सल्लागार असलेल्या शिंदे यांची झालेली मदत मोठी असून त्यांच्याशिवाय पाणीपुरवठा इतक्या कमी कालावधीत सुरू होणे अशक्य होते, असे गायकवाड यांनी सांगितले.शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे अजूनही टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथून १७८, कसबा बावडा येथून ५३, तर राजारामपुरी येथून २८ असे २५९ टॅँकर पाणी पुरविण्यात आले. 

 

टॅग्स :WaterपाणीKolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिका