संकटावेळी सेवा हा स्थायिभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:37+5:302021-06-01T04:17:37+5:30
ब्राह्मण सभा करवीर आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलधाम येथे सुरू असलेल्या काळजी केंद्रास दिलेल्या ...

संकटावेळी सेवा हा स्थायिभाव
ब्राह्मण सभा करवीर आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलधाम येथे सुरू असलेल्या काळजी केंद्रास दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते.
शहरात कोविडचा प्रकोप वाढल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी कोविड काळजी केंद्रे सुरू केली आहेत. कोल्हापुरात मध्यवर्ती ठिकाणी ब्राह्मण सभा करवीरच्या मंगलधाम या वास्तूत रा. स्व. संघ समितीच्या सहकार्याने कोविड काळजी केंद्र सुरू आहे. पूर्णपणे मोफत चालणार्या या केंद्रातून आजपर्यंत १० रुग्ण खडखडीत बरे होऊन बाहेर पडले आहेत.
या वेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, जनकल्याण समितीचे कार्यवाह राजू मोहिते व माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या सोसायटीने या केंद्रास देऊ केलेली औषधे मनीष बेंडके, अनिरुद्ध कोल्हापुरे, दिलीप पाटील, सन्मती कबूर, शिवराम कुलकर्णी यांनी आमदार पाटील यांच्याकडे सोपवली.
या वेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, ब्राह्मण सभेचे कार्यवाह श्रीकांत लिमये, ज्येष्ठ संचालक डॉ. दीपक आंबार्डेकर, राम टोपकर, राम पुरोहित, जनकल्याण समितीचे मुकुल पाडगांवकर, सचिन नंदगावकर, स्मिता गंभीर, अमर पारगावकर आणि अशोक जाधव, रवी साळोखे उपस्थित होते.