शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

सर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:39 IST

शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत.

ठळक मुद्देसर्व्हर डाऊनने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप शिवाजी विद्यापीठाचा पात्रता अर्ज भरण्यात अडचण : मुदतवाढीची मागणी

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत.कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या प्रथम वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत, त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पात्रतेचा अर्ज ऑनलाईन नोंदणी करावयाचा आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यानुसार बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए., बीसीए, आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. त्यासाठी दि. १९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हरची गती अत्यंत संथ आहे. त्यासह वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब लागत आहे. एका अर्जासाठी चार तासांचा वेळ जात आहे. या संकेतस्थळावर मदतीचा पर्यायही उपलब्ध नाही. ड्रॉपडाऊन मेनूही कार्यरत होत नाही. या तांत्रिक अडचणीकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

ऑनलाईन प्रक्रिया १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण होणे आवश्यक आहे. पण, या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. कोरोनामुळे अधिकतर विद्यार्थी हे स्मार्टफोनद्वारेच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील इंटरनेट उपलब्धतेची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे विद्यापीठाने सर्व्हरची गती वाढवावी अथवा अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्रपणे मुदत द्यावी, अशी सूचना काही पालकांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, तांत्रिक अडचण असल्यास ती दूर केली जाईल. विद्यार्थीहित लक्षात घेऊन हे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विद्यापीठाच्या प्रशासनाचा विचार सुरू आहे.अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्ज नाहीतविद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाची महाविद्यालयांमधील प्रक्रिया पूर्ण केली आहे. पात्रता अर्ज भरण्याची सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना केली आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग अद्याप भरत नसल्याने विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये येत नाहीत. त्यामुळे अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांनी पात्रता अर्ज भरलेले नाहीत. ही स्थिती आणि सर्व्हरबाबतची तांत्रिक अडचण लक्षात घेता, हे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून होत आहे. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी