शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

कोल्हापूरच्या नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहा स्टार्टअपची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:55 IST

कोल्हापूर शहराच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा सुचविण्याचे आवाहन कोल्हापूर स्टार्टअप्‌ मिशनने केले होते. त्याला प्रतिसाद देत देशभरातील ६२२ स्टार्ट अप्‌ कंपन्यांनी तयारी दर्शविली. त्यातील सहा नावीन्यपूर्ण कल्पनांची (स्टार्टअप्‌ कंपनी) प्रत्यक्ष कामासाठी निवड केली आहे.

ठळक मुद्दे देशभरातील ६२२ कंपन्यांचा प्रतिसाद कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर, डी. वाय. पाटील ग्रुप करणार मदत

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा सुचविण्याचे आवाहन कोल्हापूर स्टार्टअप्‌ मिशनने केले होते. त्याला प्रतिसाद देत देशभरातील ६२२ स्टार्ट अप्‌ कंपन्यांनी तयारी दर्शविली. त्यातील सहा नावीन्यपूर्ण कल्पनांची (स्टार्टअप्‌ कंपनी) प्रत्यक्ष कामासाठी निवड केली आहे.

अक्वाफ्रंट इन्फ्रा (कानपूर), रिव्हरबिन, क्रेडोस इन्फ्रा (पुणे), रेस्पिरेर लिविंग सायन्स (मुंबई), समुद्योग वेस्ट चक्र (चेन्नई), इको-ग्रीन इंडिया (कोल्हापूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर, डी. वाय. पाटील ग्रुपकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या (एनएसटीइडीबी) प्रमुख डॉ. अनिता गुप्ता, आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, एसआयआयसी आयआयटी कानपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. निखिल अग्रवाल, महाराष्ट्र राज्य इनोवेशन सोसायटीचे नोडल अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत या सहा विजेत्यांची निवड घोषित करण्यात आली.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, डी. वाय. पाटील ग्रुप, आयआयटी कानपूरच्या स्टार्ट अप्‌ इंक्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर यांचा संयुक्त उपक्रम असलेले कोल्हापूर स्टार्ट अप्‌ मिशन दि. १५ जानेवारी रोजी सुरू झाले.

पाणीपुरवठा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, हवेतील शुद्धता राखण्याचे नियोजन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, इ-प्रशासन, कृषी व्यवस्थापन आणि वाहतूक या विषयांवर तोडगा काढणाऱ्या नवसंकल्पनांसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यात ६२२ ह्यस्टार्टअप्‌ह्णचे अर्ज दाखल झाले. त्यातील १२७ स्टार्टअप्‌ हे कोल्हापुरातील होते. १३३ स्टार्टअप्‌ हे पात्रतेच्या निकषांवर दुसऱ्या फेरीसाठी निवडले. त्यातून अंतिम सादरीकरणासाठी तज्ज्ञांनी १५ स्टार्टअप्‌ची निवड केली.

अंतिम सादरीकरण मंगळवारी झाले. त्यामधून सहा सर्वोत्तम नावीन्यपूर्ण नवसंकल्पना निवडण्यात आल्या. या निवडीसाठी असलेल्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये प्रा. अमिताभ बंडोपाध्याय, डॉ. सी. डी. लोखंडे, अभिजित माने, जयशंकर शर्मा, अदिती कुमार यांचा समावेश होता.या नवसंकल्पनांना सर्व मदत देणारकोल्हापूर स्टार्ट अप्‌ मिशनच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला. आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या माध्यमातून या स्टार्ट अप्‌ कंपन्यांच्या नवसंकल्पनांना कोल्हापूरमध्ये सर्व प्रकारची प्रशासकीय, स्थानिक मदत दिली जाईल. हा उपक्रम देशातील नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून नक्की नावारूपाला येईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Ruturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूर