शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोल्हापूरच्या नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहा स्टार्टअपची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:55 IST

कोल्हापूर शहराच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा सुचविण्याचे आवाहन कोल्हापूर स्टार्टअप्‌ मिशनने केले होते. त्याला प्रतिसाद देत देशभरातील ६२२ स्टार्ट अप्‌ कंपन्यांनी तयारी दर्शविली. त्यातील सहा नावीन्यपूर्ण कल्पनांची (स्टार्टअप्‌ कंपनी) प्रत्यक्ष कामासाठी निवड केली आहे.

ठळक मुद्दे देशभरातील ६२२ कंपन्यांचा प्रतिसाद कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर, डी. वाय. पाटील ग्रुप करणार मदत

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा सुचविण्याचे आवाहन कोल्हापूर स्टार्टअप्‌ मिशनने केले होते. त्याला प्रतिसाद देत देशभरातील ६२२ स्टार्ट अप्‌ कंपन्यांनी तयारी दर्शविली. त्यातील सहा नावीन्यपूर्ण कल्पनांची (स्टार्टअप्‌ कंपनी) प्रत्यक्ष कामासाठी निवड केली आहे.

अक्वाफ्रंट इन्फ्रा (कानपूर), रिव्हरबिन, क्रेडोस इन्फ्रा (पुणे), रेस्पिरेर लिविंग सायन्स (मुंबई), समुद्योग वेस्ट चक्र (चेन्नई), इको-ग्रीन इंडिया (कोल्हापूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर, डी. वाय. पाटील ग्रुपकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणार आहे.राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या (एनएसटीइडीबी) प्रमुख डॉ. अनिता गुप्ता, आमदार ऋतुराज पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, एसआयआयसी आयआयटी कानपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. निखिल अग्रवाल, महाराष्ट्र राज्य इनोवेशन सोसायटीचे नोडल अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या उपस्थितीत या सहा विजेत्यांची निवड घोषित करण्यात आली.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर, डी. वाय. पाटील ग्रुप, आयआयटी कानपूरच्या स्टार्ट अप्‌ इंक्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर यांचा संयुक्त उपक्रम असलेले कोल्हापूर स्टार्ट अप्‌ मिशन दि. १५ जानेवारी रोजी सुरू झाले.

पाणीपुरवठा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, हवेतील शुद्धता राखण्याचे नियोजन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, इ-प्रशासन, कृषी व्यवस्थापन आणि वाहतूक या विषयांवर तोडगा काढणाऱ्या नवसंकल्पनांसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यात ६२२ ह्यस्टार्टअप्‌ह्णचे अर्ज दाखल झाले. त्यातील १२७ स्टार्टअप्‌ हे कोल्हापुरातील होते. १३३ स्टार्टअप्‌ हे पात्रतेच्या निकषांवर दुसऱ्या फेरीसाठी निवडले. त्यातून अंतिम सादरीकरणासाठी तज्ज्ञांनी १५ स्टार्टअप्‌ची निवड केली.

अंतिम सादरीकरण मंगळवारी झाले. त्यामधून सहा सर्वोत्तम नावीन्यपूर्ण नवसंकल्पना निवडण्यात आल्या. या निवडीसाठी असलेल्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये प्रा. अमिताभ बंडोपाध्याय, डॉ. सी. डी. लोखंडे, अभिजित माने, जयशंकर शर्मा, अदिती कुमार यांचा समावेश होता.या नवसंकल्पनांना सर्व मदत देणारकोल्हापूर स्टार्ट अप्‌ मिशनच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला. आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या माध्यमातून या स्टार्ट अप्‌ कंपन्यांच्या नवसंकल्पनांना कोल्हापूरमध्ये सर्व प्रकारची प्रशासकीय, स्थानिक मदत दिली जाईल. हा उपक्रम देशातील नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून नक्की नावारूपाला येईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Ruturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूर