शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आयटी कंपन्यांसाठी कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर जागेचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:19 IST

जागा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू या दोन आयटी हब शहरांच्या मध्ये असलेल्या कोल्हापुरात गेल्या एक तपाहून अधिक काळ ३५० हून अधिक आयटी कंपन्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. याच कंपन्यांमधून वर्षाला ३०० कोटींहून अधिक सॉफ्टवेअरची निर्यात होत असल्याने कोल्हापूर हे आयटीसाठी किती सक्षम आहे याचा प्रत्यय जगभरातील कंपन्यांना आला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कोल्हापुरात यायची तयारी दर्शविली असून, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. शेंडा पार्कातील आयटी पार्कसाठी राखीव जागा वगळून आता कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गालगत आयटी कंपन्यांसाठी प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.कोल्हापूर शहरात सध्या ३५० हून अधिक आयटी कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यांमधील हजारो तरुण पुणे, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद या शहरांमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. कोल्हापुरात आयटीसंबंधित मोठ्या कंपन्या नसल्याने या तरुणांना नाेकरीसाठी दूरच्या शहरात जाण्याची वेळ आल्याने कोल्हापुरात आयटी पार्क निर्माण करण्याची मागणी गेल्या एक तपापासून होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी जागांचा शोध घेतल्यानंतर शेंडा पार्कातील कृषी विभागाची ३० एकर जागा आयटी पार्कला देण्याचा निर्णय २०२४ मध्ये घेण्यात आला. सध्या कृषी, महसूल व उद्योग विभाग यांच्यात याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोल्हापुरातील कार्यरत कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठीच ही जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मोठ्या कंपन्यांना जागा कुठून द्यायची, असा प्रश्न असल्याने उद्योग विभागाने कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गालगत आयटी कंपन्यांसाठी जागा पाहण्यास सुरुवात केली आहे.

आयटीमधील नामांकित कंपन्या कोल्हापुरात येत असतील तर त्यांना जागाही मोठी लागेल. प्रशासनाने त्यांना आवश्यक जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील सध्या कार्यरत आयटी कंपन्याच विस्तारीकरणाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर आयटी हब होणार आहे. - शांताराम सुर्वे, आयटी असोसिएशन, कोल्हापूर.