शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘दादां’च्या नेतृत्वावर शिक्का

By admin | Updated: April 22, 2015 00:31 IST

कारभाराची पावती : महाआघाडीच्या नेत्यांना गाफीलपणा नडला

कोल्हापूर : अकरा वर्षांतील कारभार, एकखांबी नेतृत्व, उमेदवारी निवडीत दाखवलेली मुत्सद्दीगिरी, आक्रमक प्रचार यंत्रणेमुळे ‘कोजिमाशि’ पतसंस्थेत दादासाहेब लाड यांनी परंपरा मोडीत काढण्याची किमया केली. एकत्रित बांधलेल्या मोटेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गाफिलपणा, नेत्यांमधील एकवाक्यतेच्या अभावाचा फटका महाआघाडीला बसला. पतसंस्थेवर स्थापनेपासून शिक्षक संघटनांचे प्राबल्य राहिले. मर्यादित ताकद असतानाही दादासाहेब लाड यांनी सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडली नव्हती. कारभारासह नोकरभरतीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. त्याचा परिणाम २००३ च्या निवडणुकीत दिसला. पतसंस्थेची सत्ता हातात घेतली. २००३ ते २००८ या काळात लाड यांनी नवीन व जुन्या चेहऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पतसंस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. मागील दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी होती. दादांचे सहकारी राजेंद्र रानमाळे, प्रा. जयंत आसगांवकर, बाबा पाटील हे बाजूला गेले होते. एवढेच नव्हे , तर काही करून दादांना ‘कोजिमाशि’तून बाजूला करायचेच यासाठी रानमाळे यांनी गेले पाच वर्षे प्रयत्न सुरू केले होते. शिक्षक संघटना, कृती समिती यांच्याबरोबर मोट बांधून एक तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न झाला. राम पाटील, बी. डी. पाटील, एम. एम. गळदगे, गणपतराव बागडी, बाबा पाटील, प्रा. आसगांवकर, राजेंद्र रानमाळे अशा अर्धा डझन नेत्यांमुळे महाआघाडी सक्षम दिसत होती. आपल्या विरोधात हे सर्व नेते एकत्रित येणार हे लाड यांना माहिती असल्याने त्यांनी तशी बांधणी केली होती. पॅनेलची बांधणी करताना कोणत्या तालुक्याला झुकते माप द्यायचे, उमेदवारी न मिळालेल्या तालुक्यांचे समाधान कसे करायचे? याचे आडाखे दादांनी अगोदरच बांधली होते. या उलट महाआघाडीचे पॅनेल बांधताना उमेदवारी निवडताना विजयापेक्षा आपल्या गटाच्या पदरात उमेदवारी कशी पडेल, एवढेच पाहिले. त्यामुळे गरज नसताना एकाच तालुक्यात चार-चार उमेदवारी देण्यात आल्या. त्याचा फटका महाआघाडीला बसला. त्याचबरोबर महाआघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता दिसली नाही. प्रचार यंत्रणा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने राबविली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढे नेते एकत्र आल्याने विजयाबद्दल आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. केवळ निकालाची औपचारिकता राहिल्याचे कार्यकर्ते सांगत होते, त्या-त्या तालुक्यातील उमेदवारही शाळांमध्ये पोहोचू शकले नाहीत आणि हेच घातक ठरले. एकंदरीत दादा लाड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले हे मात्र निश्चित. कागदावरच्या गणितात महाआघाडी फसलीगेली दोन-तीन वर्षे दादांना पतसंस्थेतून बाजूला करण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली होती. एक एक गट आपल्या बरोबर घेत त्यांच्या ताकदीची कागदावर गणिते मांडत गेले. अर्धा डझन नेत्यांच्या ताकदीचे गणित गृहीत धरूनच महाआघाडीने प्रचार यंत्रणा राबविली आणि येथेच ते फसले.