शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘दादां’च्या नेतृत्वावर शिक्का

By admin | Updated: April 22, 2015 00:31 IST

कारभाराची पावती : महाआघाडीच्या नेत्यांना गाफीलपणा नडला

कोल्हापूर : अकरा वर्षांतील कारभार, एकखांबी नेतृत्व, उमेदवारी निवडीत दाखवलेली मुत्सद्दीगिरी, आक्रमक प्रचार यंत्रणेमुळे ‘कोजिमाशि’ पतसंस्थेत दादासाहेब लाड यांनी परंपरा मोडीत काढण्याची किमया केली. एकत्रित बांधलेल्या मोटेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गाफिलपणा, नेत्यांमधील एकवाक्यतेच्या अभावाचा फटका महाआघाडीला बसला. पतसंस्थेवर स्थापनेपासून शिक्षक संघटनांचे प्राबल्य राहिले. मर्यादित ताकद असतानाही दादासाहेब लाड यांनी सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडली नव्हती. कारभारासह नोकरभरतीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. त्याचा परिणाम २००३ च्या निवडणुकीत दिसला. पतसंस्थेची सत्ता हातात घेतली. २००३ ते २००८ या काळात लाड यांनी नवीन व जुन्या चेहऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पतसंस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. मागील दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी होती. दादांचे सहकारी राजेंद्र रानमाळे, प्रा. जयंत आसगांवकर, बाबा पाटील हे बाजूला गेले होते. एवढेच नव्हे , तर काही करून दादांना ‘कोजिमाशि’तून बाजूला करायचेच यासाठी रानमाळे यांनी गेले पाच वर्षे प्रयत्न सुरू केले होते. शिक्षक संघटना, कृती समिती यांच्याबरोबर मोट बांधून एक तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न झाला. राम पाटील, बी. डी. पाटील, एम. एम. गळदगे, गणपतराव बागडी, बाबा पाटील, प्रा. आसगांवकर, राजेंद्र रानमाळे अशा अर्धा डझन नेत्यांमुळे महाआघाडी सक्षम दिसत होती. आपल्या विरोधात हे सर्व नेते एकत्रित येणार हे लाड यांना माहिती असल्याने त्यांनी तशी बांधणी केली होती. पॅनेलची बांधणी करताना कोणत्या तालुक्याला झुकते माप द्यायचे, उमेदवारी न मिळालेल्या तालुक्यांचे समाधान कसे करायचे? याचे आडाखे दादांनी अगोदरच बांधली होते. या उलट महाआघाडीचे पॅनेल बांधताना उमेदवारी निवडताना विजयापेक्षा आपल्या गटाच्या पदरात उमेदवारी कशी पडेल, एवढेच पाहिले. त्यामुळे गरज नसताना एकाच तालुक्यात चार-चार उमेदवारी देण्यात आल्या. त्याचा फटका महाआघाडीला बसला. त्याचबरोबर महाआघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता दिसली नाही. प्रचार यंत्रणा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने राबविली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढे नेते एकत्र आल्याने विजयाबद्दल आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. केवळ निकालाची औपचारिकता राहिल्याचे कार्यकर्ते सांगत होते, त्या-त्या तालुक्यातील उमेदवारही शाळांमध्ये पोहोचू शकले नाहीत आणि हेच घातक ठरले. एकंदरीत दादा लाड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले हे मात्र निश्चित. कागदावरच्या गणितात महाआघाडी फसलीगेली दोन-तीन वर्षे दादांना पतसंस्थेतून बाजूला करण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली होती. एक एक गट आपल्या बरोबर घेत त्यांच्या ताकदीची कागदावर गणिते मांडत गेले. अर्धा डझन नेत्यांच्या ताकदीचे गणित गृहीत धरूनच महाआघाडीने प्रचार यंत्रणा राबविली आणि येथेच ते फसले.