शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘दादां’च्या नेतृत्वावर शिक्का

By admin | Updated: April 22, 2015 00:31 IST

कारभाराची पावती : महाआघाडीच्या नेत्यांना गाफीलपणा नडला

कोल्हापूर : अकरा वर्षांतील कारभार, एकखांबी नेतृत्व, उमेदवारी निवडीत दाखवलेली मुत्सद्दीगिरी, आक्रमक प्रचार यंत्रणेमुळे ‘कोजिमाशि’ पतसंस्थेत दादासाहेब लाड यांनी परंपरा मोडीत काढण्याची किमया केली. एकत्रित बांधलेल्या मोटेमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गाफिलपणा, नेत्यांमधील एकवाक्यतेच्या अभावाचा फटका महाआघाडीला बसला. पतसंस्थेवर स्थापनेपासून शिक्षक संघटनांचे प्राबल्य राहिले. मर्यादित ताकद असतानाही दादासाहेब लाड यांनी सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांना नामोहरण करण्याची एकही संधी सोडली नव्हती. कारभारासह नोकरभरतीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. त्याचा परिणाम २००३ च्या निवडणुकीत दिसला. पतसंस्थेची सत्ता हातात घेतली. २००३ ते २००८ या काळात लाड यांनी नवीन व जुन्या चेहऱ्यांना बरोबर घेऊन त्यांनी पतसंस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. मागील दोन निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी होती. दादांचे सहकारी राजेंद्र रानमाळे, प्रा. जयंत आसगांवकर, बाबा पाटील हे बाजूला गेले होते. एवढेच नव्हे , तर काही करून दादांना ‘कोजिमाशि’तून बाजूला करायचेच यासाठी रानमाळे यांनी गेले पाच वर्षे प्रयत्न सुरू केले होते. शिक्षक संघटना, कृती समिती यांच्याबरोबर मोट बांधून एक तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न झाला. राम पाटील, बी. डी. पाटील, एम. एम. गळदगे, गणपतराव बागडी, बाबा पाटील, प्रा. आसगांवकर, राजेंद्र रानमाळे अशा अर्धा डझन नेत्यांमुळे महाआघाडी सक्षम दिसत होती. आपल्या विरोधात हे सर्व नेते एकत्रित येणार हे लाड यांना माहिती असल्याने त्यांनी तशी बांधणी केली होती. पॅनेलची बांधणी करताना कोणत्या तालुक्याला झुकते माप द्यायचे, उमेदवारी न मिळालेल्या तालुक्यांचे समाधान कसे करायचे? याचे आडाखे दादांनी अगोदरच बांधली होते. या उलट महाआघाडीचे पॅनेल बांधताना उमेदवारी निवडताना विजयापेक्षा आपल्या गटाच्या पदरात उमेदवारी कशी पडेल, एवढेच पाहिले. त्यामुळे गरज नसताना एकाच तालुक्यात चार-चार उमेदवारी देण्यात आल्या. त्याचा फटका महाआघाडीला बसला. त्याचबरोबर महाआघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता दिसली नाही. प्रचार यंत्रणा प्रत्येकाने आपल्या पद्धतीने राबविली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढे नेते एकत्र आल्याने विजयाबद्दल आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. केवळ निकालाची औपचारिकता राहिल्याचे कार्यकर्ते सांगत होते, त्या-त्या तालुक्यातील उमेदवारही शाळांमध्ये पोहोचू शकले नाहीत आणि हेच घातक ठरले. एकंदरीत दादा लाड यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले हे मात्र निश्चित. कागदावरच्या गणितात महाआघाडी फसलीगेली दोन-तीन वर्षे दादांना पतसंस्थेतून बाजूला करण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली होती. एक एक गट आपल्या बरोबर घेत त्यांच्या ताकदीची कागदावर गणिते मांडत गेले. अर्धा डझन नेत्यांच्या ताकदीचे गणित गृहीत धरूनच महाआघाडीने प्रचार यंत्रणा राबविली आणि येथेच ते फसले.