शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोल्हापुरातील बालकास स्क्रब टायफस, जिल्ह्यातील पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 04:45 IST

सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांच्या बालकाचा स्क्रब टायफस या रोगाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रज्वल प्रभाकर कातोरे असे त्याचे नाव आहे.

बोरवडे - सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांच्या बालकाचा स्क्रब टायफस या रोगाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रज्वल प्रभाकर कातोरे असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण आहे. या रोगावर लस उपलब्ध नसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत माहिती अशी, प्रज्वलला डोकेदुखी, गरगरणे, चक्कर येणे आणि ताप जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करूनदेखील ताप कमी येत नसल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.तेथे रक्त व लघवीचे नमुने तपासूनसुद्धा निदान झाले नाही. त्यामुळे हे नमुने मुंबईला पाठविले. तेथे प्रज्वलला स्क्रब टायफसची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यानंतर त्याच्यावर तातडीने योग्य उपचार सुरु करण्यात आले असून, प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.गावामध्ये आरोग्य विभागाचे एम. जी. वड, एस. डी. खाडे, एस. के. चिखले, आरोग्य सेविका एस. एस. आडसूळे , टी. ए. मोरे, एस. एस. आनुसे, मनीषा कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी दाट झाडाझुडपांत जाऊ नये, पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले आहे.ओरिएंटिया सुत्सुगामुशी बॅक्टेरियामुळे लागणओरिएंटिया सुत्सुगामुशी नामक बॅक्टेरियामुळे स्क्रब टायफस हा अतिशय गंभीर रोगाची लागण होते. रुग्णामध्ये डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये किडनीचा, तर काहींना फुप्फुसाचा त्रास होतो.कीटक चावल्यामुळे रोग पसरतोशेतात काम करताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ट्रॉम्बिक्युलिड माइट अर्थात बारीक कीटक (चिगर) चावल्यामुळे या रोगाचे जंतू पसरतात. संक्रमित कीटक उंदरांना चावल्यामुळे उंदराच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. संक्रमित मोठे कीटक चावत नाही. ते जमिनीवरच असतात. बारीक कीटक जे अतिशय सूक्ष्म, डोळ्यांना दिसत नाहीत ते चावतात आणि या रोगाचा प्रसार होतो.जपानमध्ये १८९९ मध्ये पहिला रुग्ण सापडलामाणसाला स्क्रब टायफस झाल्याची पहिल्यांदा १८९९ मध्ये जपानमध्ये नोंद आहे. भारतात दुसऱ्या महायुद्धाच्यावेळीच आसाममध्ये या रोगाच्या रुग्णाची नोंद झाली. भारत, पाकिस्तान युद्धाच्यावेळी १९६५ मध्ये या रोगाचे रुग्ण आढळले. परंतु, त्यानंतर हा आपल्या देशातून गायब झाला. १९९०मध्ये हा रोग परत आला आणि देहराडून येथे काही सैनिकांना या रोगाची लागण झाली. तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम या राज्यांत या रोगाचे रुग्ण अधिक आहेत.या रोगाचे निदान होण्यासाठी कोल्हापूरमध्ये तपासणी यंत्रणा नाही. मुंबई येथे चाचणीसाठी रक्त व लघवीचे नमुने पाठवावे लागतात. त्यामुळे बराच कालावधी लागून रुग्णावर उपचार होण्यास विलंब होतो. त्यासाठी कोल्हापुरात या रोगाची चाचणी करण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. सुदैवाने माझा मुलगा डॉ. व्यंकटेश दीक्षित यांच्या प्रयत्नामुळे योग्य उपचार मिळाल्याने बचावला आहे.- प्रभाकर कातोरे, वडील

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर