शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोल्हापुरातील बालकास स्क्रब टायफस, जिल्ह्यातील पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 04:45 IST

सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांच्या बालकाचा स्क्रब टायफस या रोगाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रज्वल प्रभाकर कातोरे असे त्याचे नाव आहे.

बोरवडे - सोनाळी (ता. कागल) येथील सात वर्षांच्या बालकाचा स्क्रब टायफस या रोगाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. प्रज्वल प्रभाकर कातोरे असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण आहे. या रोगावर लस उपलब्ध नसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत माहिती अशी, प्रज्वलला डोकेदुखी, गरगरणे, चक्कर येणे आणि ताप जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करूनदेखील ताप कमी येत नसल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले.तेथे रक्त व लघवीचे नमुने तपासूनसुद्धा निदान झाले नाही. त्यामुळे हे नमुने मुंबईला पाठविले. तेथे प्रज्वलला स्क्रब टायफसची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यानंतर त्याच्यावर तातडीने योग्य उपचार सुरु करण्यात आले असून, प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.गावामध्ये आरोग्य विभागाचे एम. जी. वड, एस. डी. खाडे, एस. के. चिखले, आरोग्य सेविका एस. एस. आडसूळे , टी. ए. मोरे, एस. एस. आनुसे, मनीषा कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी दाट झाडाझुडपांत जाऊ नये, पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले आहे.ओरिएंटिया सुत्सुगामुशी बॅक्टेरियामुळे लागणओरिएंटिया सुत्सुगामुशी नामक बॅक्टेरियामुळे स्क्रब टायफस हा अतिशय गंभीर रोगाची लागण होते. रुग्णामध्ये डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये किडनीचा, तर काहींना फुप्फुसाचा त्रास होतो.कीटक चावल्यामुळे रोग पसरतोशेतात काम करताना, गवतावर बसल्याने किंवा ट्रेकिंग करताना ट्रॉम्बिक्युलिड माइट अर्थात बारीक कीटक (चिगर) चावल्यामुळे या रोगाचे जंतू पसरतात. संक्रमित कीटक उंदरांना चावल्यामुळे उंदराच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो. संक्रमित मोठे कीटक चावत नाही. ते जमिनीवरच असतात. बारीक कीटक जे अतिशय सूक्ष्म, डोळ्यांना दिसत नाहीत ते चावतात आणि या रोगाचा प्रसार होतो.जपानमध्ये १८९९ मध्ये पहिला रुग्ण सापडलामाणसाला स्क्रब टायफस झाल्याची पहिल्यांदा १८९९ मध्ये जपानमध्ये नोंद आहे. भारतात दुसऱ्या महायुद्धाच्यावेळीच आसाममध्ये या रोगाच्या रुग्णाची नोंद झाली. भारत, पाकिस्तान युद्धाच्यावेळी १९६५ मध्ये या रोगाचे रुग्ण आढळले. परंतु, त्यानंतर हा आपल्या देशातून गायब झाला. १९९०मध्ये हा रोग परत आला आणि देहराडून येथे काही सैनिकांना या रोगाची लागण झाली. तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम या राज्यांत या रोगाचे रुग्ण अधिक आहेत.या रोगाचे निदान होण्यासाठी कोल्हापूरमध्ये तपासणी यंत्रणा नाही. मुंबई येथे चाचणीसाठी रक्त व लघवीचे नमुने पाठवावे लागतात. त्यामुळे बराच कालावधी लागून रुग्णावर उपचार होण्यास विलंब होतो. त्यासाठी कोल्हापुरात या रोगाची चाचणी करण्यासाठी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. सुदैवाने माझा मुलगा डॉ. व्यंकटेश दीक्षित यांच्या प्रयत्नामुळे योग्य उपचार मिळाल्याने बचावला आहे.- प्रभाकर कातोरे, वडील

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर