शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

करवीर क्षेत्रात आॅक्टोबरपासून वृश्चिक महापर्वकाल-स्वच्छताविषयी जागृती : देशातील १२ पर्वकालामध्ये भोगावती नदीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:50 IST

कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र, या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक

इंदुमती गणेश, ।कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र, या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे. पंचांगकर्त्यांनी यंदाच्या पंचांगात त्याचा समावेश करून त्यावर मोहोर उमटविली आहे.

यंदा मात्र, ‘नमामी पंचगंगा’ या संस्थेच्या वतीने महापर्वकालाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.गुरूने विशिष्ट राशीत प्रवेश केल्यानंतर देशातील बारा ठिकाणी कुंभमेळा, महापर्वकाल सुरू होतो. गुरूचा प्रत्येक राशीत वर्षभर मुक्काम असल्याने हा कालावधी वर्षाचा असतो. गुरूने सिंह राशीत प्रवेश केला की नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा, कुंभ राशीत प्रवेश केला की हरिद्वारमध्ये कुंभमेळा, कन्या राशीत प्रवेश केला की नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाल होतो. या काळात स्थानिक नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण होते. ती वर्षभर या नदीच्या सान्निध्यात राहते आणि भक्त तिच्या भेटीला येतात, अशी संकल्पना आहे. निसर्ग, नदी, पर्यावरण आणि मानवाला जोडणारी सांस्कृतिक साखळी म्हणून महापर्वकालाचे महत्त्व आहे.

महापर्वकालामध्ये करवीरातील भोगावती नदीचा समावेश असल्याने शंकराचार्यांसह धार्मिक बाबींचे ज्ञान असलेल्या व्यक्ती या कालावधीत तेथे जाऊन स्नान करतात. हीच भोगावती नदी पुढे पंचगंगेला मिळते. नदीची स्वच्छता, तिचे महत्त्व पोहोचविण्यासाठी ‘नमामी पंचगंगा’ नावाची संस्था स्थापन करून , त्या संस्थेतर्फे या महापर्वकालाचे आयोजन केले आहे. त्यासाठी सर्व पीठांचे शंकराचार्य, धर्मपीठांचे गुरू, आखाडे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.दोन भागांत महापर्वकालधार्मिक ग्रंथ व यंदाच्या वर्षीच्या मराठी पंचांगांमध्ये नकाशासहित महापर्वकालात भोगावतीचे स्थान विशद करण्यात आले आहे.यंदा ११ आॅक्टोबरला सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी गुरू वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हापासून शिंगणापूर येथे महापर्वकाल असतो.१२ आॅक्टोबरला येथील हटकेश्वराच्या मंगल स्नान महापर्वाची सुरुवात होईल.हा महापर्वकाल ११ आॅक्टोबर ते २९ मार्च २०१९ व २३ एप्रिल ते ५ नोव्हेंबर २०१९ या दोन कालावधीत होत आहे. 

देशातील १२ महापर्वकालांमध्ये करवीरातील भोगावती व पर्यायाने पंचगंगा नदीचा समावेश ही धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूूप मोठी गोष्ट आहे. अज्ञानामुळे आजवर येथे महापर्वकाल साजरा झाला नाही. यंदा मात्र त्याचे आयोजन करून नदीचे महत्त्व आणि तिची स्वच्छता यांबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.- उमाकांत राणिंगा(‘नमामी पंचगंगा’ उपक्रमाचे मार्गदर्शक)

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूरriverनदी