शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सतेज पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड घट्ट

By राजाराम लोंढे | Updated: November 20, 2023 12:43 IST

‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ची धुरा : जिल्हा नेतृत्वाची पोकळी भरून काढणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे; किंबहुना गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक तालुक्यात लक्ष देत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. त्यामुळेच ‘गोकुळ,’ जिल्हा बँकेपाठोपाठ ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांच्या भूमिकेला महत्त्व राहिले आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीत पाच जागा तर घेतल्याच; त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीची धुराच देऊन त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीवर शिक्कामोर्तबही केले.अलीकडील दहा-पंधरा वर्षांत येथील लोकप्रतिनिधींचे ‘मी आणि माझा मतदारसंघ’ असेच काहीसे समीकरण झाले आहे. दुसऱ्या तालुक्यात लक्ष दिले तर आपल्या अडचणी वाढतील, या भीतीपोटी प्रत्येकाने आपले गड शाबूत राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्ह्याचे नेते म्हणून स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब माने, उदयसिंगराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार महादेवराव महाडिक एवढीच नावे घ्यावी लागतात.या नेत्यांनी प्रत्येक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात ताकद निर्माण केल्याने त्यांना वजा करून जिल्ह्याचे राजकारण कधी करताच आले नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँंग्रेस सोडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोठी संधी आली होती. त्यांनी काहीसा प्रयत्न केला; पण जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणासाठी त्यांनी ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’ वगळता इतर तालुक्यांतील दुसऱ्या पक्षाचे नेते दुखावतील या भीतीपोटी त्यांनी तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही.त्यामुळे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर जिल्हा नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी आमदार सतेज पाटील यांनी भरून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात जून २०१९ पासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पडल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात संघटना बळकट करण्याचे धोरण स्वीकारले. त्याचे फलित म्हणून जिल्ह्यात काँग्रेसचे चार विधानसभेचे व दोन विधानपरिषदेचे आमदार निवडून आणत, नेतृत्वाची चुणूक हायकमांडला दाखवली.

‘गोकुळ’मध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन सत्तांतर घडवले. येथेही त्यांनी जागा वाटप करताना भविष्यातील राजकारणाचा विचार करून सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन भौगोलिक समतोल राखला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. ‘बिद्री’ कारखान्यात आतापर्यंत त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागत होते. यावेळी पाच जागा घेऊन त्यांनी आपले निवडणूकीतील महत्व अधोरिखित केले.कागल वगळता सर्व तालुक्यांत ताकदआमदार सतेज पाटील यांनी अकरा तालुक्यांत आपली निर्णायक ताकद निर्माण केली आहे. ‘कागल’मध्ये तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी आहेत; पण तेथील गटातटांच्या राजकारणामुळे अजून त्यांनी हात घातलेला दिसत नाही.

तालुकानिहाय अशी आहे सतेज पाटील यांची ताकद..

  • कोल्हापूर शहर, करवीर, गगनबावडा : स्वत:चा गट
  • राधानगरी : ‘गोकुळ’चे संचालक राजेंद्र मोरे, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले
  • भुदरगड : माजी सभापती सत्यजित जाधव, मधुअप्पा देसाई, सचिन घोरपडे, जीवन पाटील, शामराव देसाई, आदी.
  • चंदगड : ‘दौलत’चे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील.
  • आजरा : ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी.
  • शाहूवाडी : ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड.
  • पन्हाळा : ‘गोकुळ’चे संचालक अमरसिंह पाटील
  • हातकणंगले : शशांक बावचकर, शशिकांत खवरे, राहुल खंजिरे यांसह ‘राजाराम’ कारखान्याशी संबधित पदाधिकारी
  • शिरोळ : गणपतराव पाटील
  • गडहिंग्लज : विद्याधर गुरबे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस