शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Satara-Kagal Highway: अपूर्ण काम, खड्ड्यांचे सेवा रस्ते, मग टोल का घेता ?

By समीर देशपांडे | Updated: March 17, 2025 16:42 IST

नागरिकांकडून विचारणा, टोलच्या कालावधीतही वाढ

समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे कागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामाची पूर्तता झालेली नाही. दोन्ही टप्प्यांच्या कामाला संबंधित कंपन्यांनी मुदतवाढ मागितलेली आहे. अनेक कामे अपूर्ण आहेत. सेवा रस्त्यातील खड्डे तसेच आहेत. प्रवासाला पहिल्यापेक्षा खूपच वेळ जात आहे. मग टोल कशाला घेता अशी विचारणा वाहनधारक करत आहेत. काम पूर्ण होईपर्यंत टोल तरी घेऊ नका अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.गेली दोन वर्षे कागल, सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे; परंतु कागल ते पेठ नाका हे काम निम्मेही झालेले नाही. शेंद्रा फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी पुलांची कामे संथगतीने सुरू आहेत. कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोली येथील प्रस्तावित पुलाची रचनाच आता बदलल्याने किमान अडीच वर्षे इथले काम मार्गी लागणार नाही. कागल ते पेठ नाका या कामापेक्षा कराड पुलाचे काम मोठे असूनही पेठ नाका ते शेंद्रा फाटा या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.परंतु सेवा रस्त्यांचा दर्जा खराब आहे. सहापदरीकरण झालेल्या रस्त्यावरही मध्येच जोरात दणके बसतात. या सगळ्यामुळे वेगही घेता येत नाही. कोल्हापूरहून पुण्याला जायला सहा तास लागत आहेत. आता पावसाळ्यात तर वाहनधारकांचे आणखी हाल. नेतेमंडळींना वाहनधारकांच्या या दुखण्याकडे पाहण्यासाठी लक्ष नाही. विलंब का झाला विचारायला जावे तर अनेक लोकप्रतिनिधी, जनता यांच्या मागणीनुसार पूल वाढवले आहेत. रचना बदलल्या आहेत. त्यामुळे मूळ कामात बदल केल्यामुळे विलंब होत आहे असे सांगण्यात येत आहे.ही वस्तुस्थिती असली तर यामुळे वाहनधारकांचे हाल संपत नाहीत हे देखील वास्तव आहे. उत्तम रस्त्यासाठी म्हणून जर वाहनधारकांकडून टोल घेतला जात असेल तर रस्ता उत्तम झाल्यानंतरच टोल घ्यावा. तोपर्यंत टोल माफ करावा. नाहीतरी कंपनीला अपेक्षित टोल उत्पन्न मिळाले नाही तर टोलसाठी मुदतवाढ दिलीच जाते. तर मग खराब रस्त्यांसाठी टोल काय द्यायचा हा खरा प्रश्न आहे.

तर रस्त्यावर उतरावे लागेलकोल्हापूर-सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला विलंब लागत आहे. त्याचा फटका नेहमी आम्हाला मुंबईला जाताना बसतो. वाहनधारकांचे काय हाल होतात हे आम्ही प्रवासात पाहत असतो. असे असूनही टोल वसुली मात्र अखंडपणे सुरू आहे. आमची शासनाकडे मागणी आहे की जोपर्यंत सहापदरीकरण पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका. यासाठी आता शिवसेना वेळ पडली तर रस्त्यावरही उतरणार आहे. - संजय पवार, उपनेते, उद्धवसेना

इतक्या प्रदीर्घ कालावधीत आम्ही टोल का देत आहोत हेच कळत नाही. वेळ, इंधन, वाहन, शरीर यांची अक्षम्य हेळसांड करत केला जाणारा हा प्रवास. किमान रस्ता पूर्ण होईपर्यंत टोलमुक्त असायला हवा. एका महत्त्वाच्या विषयावर ‘लोकमत’ सातत्याने लिहीत आहे त्याबद्दल आभार. - समीर परुळेकर 

ज्या ठिकाणी रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी गाड्या उडतात. काही ठिकाणी रस्ता निमुळता होत जातो. तिथे कोणतेही दर्शक नाहीत. खूप धोकादायक प्रकार आहे सगळा.  - प्रसाद जमदग्नी

‘लोकमत’ने खूप ज्वलंत प्रश्न मांडला आहे त्याबद्दल वाचकांच्या वतीने आभार. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या ज्या भावना ‘लोकमत’ने मांडल्या आहेत. त्या समजून त्यावर कार्यवाही करावी.  - शिवाजी जनवाडे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका