शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जनतेच्या हाकेला धावून जाणारा सरपंच हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:08 IST

जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला.

ठळक मुद्देजनतेच्या हाकेला धावून जाणारा सरपंच हरपलानितीन पाटील यांचे निधन : बाजारभोगावमध्ये तीन दिवस दुखवटा

बाजारभोगाव : जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला.

कोरोनाच्या काळात गाव सुरक्षित राहावे म्हणून रात्रीचा दिवस करणारा कार्यकर्ता अखेर त्या धावपळीचाच बळी ठरला. त्यांच्या निधनानिमित्त सर्व व्यवहार तसेच शासकीय कार्यालये तीन दिवस बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येणार आहे. एखाद्या सरपंचासाठी गावाने तीन दिवसांचा दुखवटा उत्स्फूर्तपणे पाळण्याची ही दुर्मिळ घटना असावी. त्यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.नितीन पाटील यांनी आपल्या कार्यातूनच पश्चिम पन्हाळ्यातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवले होते. बाजारभोगावचे पहिलेवहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी अल्पावधीत उठावदार काम केले होते. अजून बराच मोठा राजकीय पल्ला गाठायचा होता तोपर्यंतच त्यांना नियतीने गाठले. त्यांच्या निधनाने गोरगरिब जनता पोरकी झालीच शिवाय जनसुराज्यशक्ती पक्षाचा त्या परिसरातील वाली गेल्याची भावना व्यक्त झाली.

प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत शामराव भाऊ पाटील यांचा नितीन हा दोन नंबरचा मुलगा. राजकारण विरहित समाजकारणात अधिक सक्रीय राहिल्याने तसेच गट तट न मानता गावातील गोरगरिबांची छोटी मोठी कामे करत असल्याने लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण होत गेले.

आमदार विनय कोरे यांच्या निकट संपर्कामुळे त्यांचा खडतर राजकीय मार्ग सुकर होत गेला. गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मातब्बर सगळे विरोधात असतानाही गावांने त्यांच्या कामाची उतराई म्हणून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिले.

गतवर्षी महापुरासारख्या आपत्तीवेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी प्रशासनाच्या मदतीने अनेकांची सुटका केली. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना लाखो रुपयांची मदतही मिळवून दिली. यंदाच्या पुरावेळीही किसरुळमधील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी यांत्रिक बोटीतून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.अत्यंत प्रेमळ , लाघवी स्वभाव ; लोकांच्या कोणत्याही अडी-अडचणीवेळी रात्री-अपरात्री धावून जाण्याची वृत्ती, प्रेमाने जमवलेला आणि जोपासलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा हेच खरे नितीन पाटील यांचे संचित. पण हे सगळेच मागे टाकून ते अचानक जीवनातून उठून गेले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर