शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
4
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
5
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
6
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
7
Women Health: मासिक पाळी येण्यापूर्वी मूड का बिघडतो? शरीरातील 'हे' ५ बदल वेळीच ओळखा!
8
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
9
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
10
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
11
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
12
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
13
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
14
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
15
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
16
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
17
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
18
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
19
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
20
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या हाकेला धावून जाणारा सरपंच हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 14:08 IST

जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला.

ठळक मुद्देजनतेच्या हाकेला धावून जाणारा सरपंच हरपलानितीन पाटील यांचे निधन : बाजारभोगावमध्ये तीन दिवस दुखवटा

बाजारभोगाव : जनतेच्या हाकेला धावून जाणारा माणूस अशी ओळख प्रस्थापित केलेले बाजारभोगांवचे सरपंच नितीन शामराव पाटील (वय ४७)यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशीला धक्का बसला.

कोरोनाच्या काळात गाव सुरक्षित राहावे म्हणून रात्रीचा दिवस करणारा कार्यकर्ता अखेर त्या धावपळीचाच बळी ठरला. त्यांच्या निधनानिमित्त सर्व व्यवहार तसेच शासकीय कार्यालये तीन दिवस बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येणार आहे. एखाद्या सरपंचासाठी गावाने तीन दिवसांचा दुखवटा उत्स्फूर्तपणे पाळण्याची ही दुर्मिळ घटना असावी. त्यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.नितीन पाटील यांनी आपल्या कार्यातूनच पश्चिम पन्हाळ्यातील जनतेच्या हृदयात स्थान मिळवले होते. बाजारभोगावचे पहिलेवहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी अल्पावधीत उठावदार काम केले होते. अजून बराच मोठा राजकीय पल्ला गाठायचा होता तोपर्यंतच त्यांना नियतीने गाठले. त्यांच्या निधनाने गोरगरिब जनता पोरकी झालीच शिवाय जनसुराज्यशक्ती पक्षाचा त्या परिसरातील वाली गेल्याची भावना व्यक्त झाली.

प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत शामराव भाऊ पाटील यांचा नितीन हा दोन नंबरचा मुलगा. राजकारण विरहित समाजकारणात अधिक सक्रीय राहिल्याने तसेच गट तट न मानता गावातील गोरगरिबांची छोटी मोठी कामे करत असल्याने लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण होत गेले.

आमदार विनय कोरे यांच्या निकट संपर्कामुळे त्यांचा खडतर राजकीय मार्ग सुकर होत गेला. गेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मातब्बर सगळे विरोधात असतानाही गावांने त्यांच्या कामाची उतराई म्हणून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिले.

गतवर्षी महापुरासारख्या आपत्तीवेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी प्रशासनाच्या मदतीने अनेकांची सुटका केली. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना लाखो रुपयांची मदतही मिळवून दिली. यंदाच्या पुरावेळीही किसरुळमधील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी यांत्रिक बोटीतून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.अत्यंत प्रेमळ , लाघवी स्वभाव ; लोकांच्या कोणत्याही अडी-अडचणीवेळी रात्री-अपरात्री धावून जाण्याची वृत्ती, प्रेमाने जमवलेला आणि जोपासलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा हेच खरे नितीन पाटील यांचे संचित. पण हे सगळेच मागे टाकून ते अचानक जीवनातून उठून गेले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर