शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

संजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST

देवाळे वार्ताहर संजय पाटील देवाळे : ग्रामीण भागात बहुतांशी गावांत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान व गावठाण क्षेत्रात ...

देवाळे वार्ताहर

संजय पाटील

देवाळे :

ग्रामीण भागात बहुतांशी गावांत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान व गावठाण क्षेत्रात ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय स्वार्थापोटी ही अतिक्रमणे हटविण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बोटचेपी भूमिकेमुळे दिवसेंदिवस ही अतिक्रमणे वाढत चालली आहेत. परिणामी, अतिक्रमणाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पूर्वीची अतिक्रमणे काढून नव्याने होणारी अतिक्रमणे रोखण्याची काळाची गरज बनली आहे.

ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या गायरान, गावठाण, पाणंद रस्ते व गाव तळेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी अतिक्रमणे केली आहेत. गायरान क्षेत्र हे प्रामुख्याने डोंगर किंवा माळरान आहे. गायरानात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून शेती केली जात आहे. या ठिकाणी जनावरांना शेड, काही ठिकाणी पक्की घरे ग्रामस्थांनी बांधली आहेत. गावठाणसुद्धा घरे, दुकाने, जनावरांना शेड, चारचाकी पार्किंगसाठी शेड उभे केले आहे.

ही अतिक्रमणे ज्या त्या वेळी हटविणे गरजेचे असताना मात्र ग्रामपंचायतीकडून राजकीय हित साधण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यातून अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून बडगा उगारलाच तर अगोदर गावातील अन्यत्र झालेले अतिक्रमण हटवा मग माझ्या अतिक्रमणाला हात लावा, अशी अरेरावी ग्रामस्थ करतात. यामुळे दिवसेंदिवस या अतिक्रमणात भरच पडत आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या गावाशिवेचा व पाणंद रस्ता शेतीपयोगी माल व साहित्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना सोयीचे असते; पण हे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत.

तालुक्यातील महसूल व भूमिअभिलेख कार्यालयाने तालुक्याच्या गाव रस्त्यांची व गावाशिवांना अतिक्रमणापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़. मात्र, दिवसेंदिवस अतिक्रमणाचा सपाटा वाढत आहे़ परिणामी, जुने ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते सध्या बेपत्ता झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे़

गावाशिवेचा रस्ता, पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शेतीपयोगी माल, साहित्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे़ पाणंद रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांची भांडणे होऊन प्रकरणे न्यायालयात पोहोचत आहेत. मात्र, पाणंद रस्त्याच्या, गाव रस्त्याचा प्रश्न सुटण्याऐवजी जटिल होत आहे. गावांच्या परिसरातील जंगलाची तोड करून त्या ठिकाणी शेती केली जात आहे; परंतु वनविभाग बघ्याची भूमिका घेत या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे़ शासकीय जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रतिक्रिया....

‘ग्रामपंचायतीच्या गायरान, गावठाण व गाव पाणंद रस्ता आदी ठिकाणी ग्रामस्थांनी अतिक्रमणे केल्यास गावच्या विकासाला खीळ बसते. अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांचे सहकार्य असेल तर अतिक्रमणे काढणे कोणत्याही परिस्थितीत शक्य आहे.’

मा. उपसरपंच जयवंत कदम, आवळी, ता. पन्हाळा