शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड अन् आज मृत्यू; संग्रामच्या निधनानं गावात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 20:38 IST

संग्रामला तीन चार दिवसापूर्वी ताप आला होता. त्याच्यावर गावी उपचार सुरू होते.

- शिवाजी लोंढे

कसबा बीड : सडोली दुमाला (ता.करवीर ) येथील नुकतीच ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झालेल्या संग्राम सीताराम गुरव  (वय २७) या युवकाचे डेंग्यूने आज मंगळवारी मृत्यू झाला. संग्रामची बातमी गावावर शोककळा पसरली. या घटनेने सडोली दुमालासह परिसरात हळहळ व्यक्त होत  आहे.

संग्रामला तीन चार दिवसापूर्वी ताप आला होता. त्याच्यावर गावी उपचार सुरू होते. तपासणी रिपोर्टनुसार  डेंग्यू झाल्याचे कळले. उपचार करूनही प्रकृती नाजूक बनल्याने त्याला काल सोमवारी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  डेंग्यूसह कविळीमुळे प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. उपचाराला शरीराने साथ न दिल्याने संग्रामचे निधन झाले. संग्रामचे निधन झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी  फोडलेला टाहो मन हेलावून टाकणारा होता.

सडोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पाडली. यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांची  बिनविरोध निवड करण्यात आली होती. फक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती. या बिनविरोध सदस्यात प्रभाग क्रं. ३ मधून संग्रामची निवड करण्यात आली होती. मागील  पंचवार्षिक निवडणुकीत तो निवडून आला होता. सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून तो काम पाहणार होता. तत्पूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. 

वारकरी संप्रदायातील संग्राम गावातील सर्व धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा संग्राम असा निघून गेल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. त्याला १ वर्षाची मुलगीही आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि.२९) आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतDeathमृत्यू