शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

Kolhapur: समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौदर्यांला बाधा, दरीतील झाडे तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:02 IST

भूस्खलनाचा धोका वाढला

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : नागमोडी वळणे, घनदाट झाडी, थंड हवेची अनुभूती देणारा रस्ता, सेल्फी पॅाइंट अन् निसर्गरम्य वातावरणाने मन प्रसन्न करणाऱ्या वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला समृद्धी मार्गाच्या विस्तारीकरणामुळे बाधा निर्माण झाली आहे. तीन किलोमीटर अंतराच्या प्रवासातील घाट माथ्याच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद आता प्रवासादरम्यान प्रवाशांना अनुभवयास मिळणार नाही. नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ होत आहे. दरीतील झाडे तोडून तेथे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकासामुळे घाटाच्या निसर्ग सौंदर्यांचे विद्रुपीकरण होत असल्याने निसर्गप्रेमींतून चिंता व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा, पन्हाळा आणि रत्नागिरी या प्रेक्षणीय पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी वाघबीळ घाटातूनच जावे लागते. वेडीवाकड्या वळणांमुळे वाघबीळ घाटाचा प्रवास धोकादायक वाटत असला घाटातील आल्हादायक वातावरणामुळे घाटातील प्रवास आनंददायी वाटत असल्याचे प्रवाशांत चर्चा आहे. रस्ते विकासामुळे तो अनुभव आता अनुभवायला मिळणार नाही.

नलवडे बंगल्यापासून घाटाला सुरुवात होते. अगदी वाघबीळ फाट्यापर्यंतच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंत अकरा नागमोडी वळणे येतात. घाटातील वळणे काढण्यासाठी डोंगर फोडल्याने घाटाच्या डोंगराचे विद्रुपीकरण झाले आहे. वळणाच्या ठिकाणी असणाऱ्या खोलगट दरीवर भराव टाकून त्यावर सपाटीकरणाचे काम सुरू आहे. हिरव्यागार झाडीसोबत सेल्फी काढताना तरुणाईचे पाय आपोआप घाटाच्या वळणावरील कठड्याकडे वळायाचे. विस्तारीकरणामुळे तो पॅाइंट आता शोधावा लागतो. एकंदरीत समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला बाधा पोहोचल्याने घाटामाथ्याचा आनंद आता प्रवासादरम्यान लुटता येत नाही.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोकाजैवविविधतेने नटलेल्या वाघबीळ घाटात घनदाट झाडींमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक वेळा आढळून आले. राक्षी, धबधबेवाडीच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी वाधबीळ घाटाचा रस्ता ओलांडून पडळवाडीच्या पाझर तलावाकडे येतात. यापुढे मोठा मार्ग ओलांडताना त्यांना त्रास होणार आहे. झाडी तोडून आणि डोंगर फोडून घाटमाथ्याचे अस्तित्व संपविल्याने वाघबीळ घाट परिसर ओसाड दिसत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.भूस्खलनाचा धोका वाढलादळणवळणाच्या दृष्टीने कित्येक वर्षांपूर्वी बनविलेल्या वाघबीळ घाटात कधीच दरड कोसळली नाही की, वाहतूक यंत्रणा कोलमडली नाही, हा इतिहास आहे. समृद्धी मार्गासाठी डोंगर फोडायला सुरुवात केल्यापासून वाघबीळ फाट्याजवळील दुसऱ्या वळणाजवळ भूस्खलन झाले होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर खोदल्याने दगडाच्या निखळलेल्या कडा ढासळून भूस्खलन होण्याची भीती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग