शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Kolhapur: समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौदर्यांला बाधा, दरीतील झाडे तोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:02 IST

भूस्खलनाचा धोका वाढला

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : नागमोडी वळणे, घनदाट झाडी, थंड हवेची अनुभूती देणारा रस्ता, सेल्फी पॅाइंट अन् निसर्गरम्य वातावरणाने मन प्रसन्न करणाऱ्या वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला समृद्धी मार्गाच्या विस्तारीकरणामुळे बाधा निर्माण झाली आहे. तीन किलोमीटर अंतराच्या प्रवासातील घाट माथ्याच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद आता प्रवासादरम्यान प्रवाशांना अनुभवयास मिळणार नाही. नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ होत आहे. दरीतील झाडे तोडून तेथे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. रस्ते विकासामुळे घाटाच्या निसर्ग सौंदर्यांचे विद्रुपीकरण होत असल्याने निसर्गप्रेमींतून चिंता व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा, पन्हाळा आणि रत्नागिरी या प्रेक्षणीय पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी वाघबीळ घाटातूनच जावे लागते. वेडीवाकड्या वळणांमुळे वाघबीळ घाटाचा प्रवास धोकादायक वाटत असला घाटातील आल्हादायक वातावरणामुळे घाटातील प्रवास आनंददायी वाटत असल्याचे प्रवाशांत चर्चा आहे. रस्ते विकासामुळे तो अनुभव आता अनुभवायला मिळणार नाही.

नलवडे बंगल्यापासून घाटाला सुरुवात होते. अगदी वाघबीळ फाट्यापर्यंतच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंत अकरा नागमोडी वळणे येतात. घाटातील वळणे काढण्यासाठी डोंगर फोडल्याने घाटाच्या डोंगराचे विद्रुपीकरण झाले आहे. वळणाच्या ठिकाणी असणाऱ्या खोलगट दरीवर भराव टाकून त्यावर सपाटीकरणाचे काम सुरू आहे. हिरव्यागार झाडीसोबत सेल्फी काढताना तरुणाईचे पाय आपोआप घाटाच्या वळणावरील कठड्याकडे वळायाचे. विस्तारीकरणामुळे तो पॅाइंट आता शोधावा लागतो. एकंदरीत समृद्धी मार्गामुळे वाघबीळ घाटाच्या सौंदर्याला बाधा पोहोचल्याने घाटामाथ्याचा आनंद आता प्रवासादरम्यान लुटता येत नाही.

वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोकाजैवविविधतेने नटलेल्या वाघबीळ घाटात घनदाट झाडींमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक वेळा आढळून आले. राक्षी, धबधबेवाडीच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी वाधबीळ घाटाचा रस्ता ओलांडून पडळवाडीच्या पाझर तलावाकडे येतात. यापुढे मोठा मार्ग ओलांडताना त्यांना त्रास होणार आहे. झाडी तोडून आणि डोंगर फोडून घाटमाथ्याचे अस्तित्व संपविल्याने वाघबीळ घाट परिसर ओसाड दिसत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.भूस्खलनाचा धोका वाढलादळणवळणाच्या दृष्टीने कित्येक वर्षांपूर्वी बनविलेल्या वाघबीळ घाटात कधीच दरड कोसळली नाही की, वाहतूक यंत्रणा कोलमडली नाही, हा इतिहास आहे. समृद्धी मार्गासाठी डोंगर फोडायला सुरुवात केल्यापासून वाघबीळ फाट्याजवळील दुसऱ्या वळणाजवळ भूस्खलन झाले होते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर खोदल्याने दगडाच्या निखळलेल्या कडा ढासळून भूस्खलन होण्याची भीती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग