शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सेनापती कापशीच्या चप्पलचा परदेशातही डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:40 IST

शशिकांत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनापती कापशी : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा लाभलेले चिकोत्रा खोºयातील सेनापती कापशी (ता. कागल) हे एक सधन गाव. दोनशे वर्षांपूर्वी येथील गोविंदा लक्ष्मण चव्हाण यांनी येथील राजे घराण्यातील घोरपडे सरकारांना चमड्यापासून एक आकर्षक चप्पलचा जोड करून दिला. तत्कालीन घोरपडे सरकारांनी हा ...

ठळक मुद्दे एका चप्पलच्या जोडची किंमत चार हजार रुपये

शशिकांत भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कसेनापती कापशी : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा वारसा लाभलेले चिकोत्रा खोºयातील सेनापती कापशी (ता. कागल) हे एक सधन गाव. दोनशे वर्षांपूर्वी येथील गोविंदा लक्ष्मण चव्हाण यांनी येथील राजे घराण्यातील घोरपडे सरकारांना चमड्यापासून एक आकर्षक चप्पलचा जोड करून दिला. तत्कालीन घोरपडे सरकारांनी हा जोड देवास (उत्तर प्रदेश)सह इतर संस्थानांतील सरकारांना दाखविला. त्यांनाही हा जोड आवडला व त्यांनीही या चप्पलची मागणी केली आणि पाहता पाहता कापशी चप्पलने देश-परदेशांतही आपली हुकमी बाजारपेठ तयार केली. टाटा-बाटाच्या जमान्यात आजही कोणतीही जाहिरात न करता कापशी चप्पलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.एक कापशी चप्पलचा जोड तयार होण्यास पाच ते सहा दिवस लागतात. चप्पलवरचे आकर्षक रेखीव काम महिला करतात. हे रेखीव कामही चमड्यापासून केले जाते. एका चप्पलच्या जोडची किंमत चार हजार रुपये असून, मागणीप्रमाणेच चप्पल तयार केले जाते. चमडे कठीण करण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागते.कै. दत्तात्रय कृष्णाजी चव्हाण यांनी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कित्येक वर्षे कापशी चप्पलचा जोड तयार करून दिला आहे. आजही त्यांच्या पायाचे माप चव्हाण यांच्या दुकानात उपलब्ध आहे. दत्तात्रय चव्हाण यांच्यानंतर मुकुंद चव्हाण त्यांच्या पत्नी शालन चव्हाण, सूर्यकांत चव्हाण हा पूर्वापार व्यवसाय या ठिकाणी करीत आहेत.ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, देवास, कर्नाटक व महाराष्ट्रातील सरकार घराण्यातून व लोकप्रतिनिधींमधून आजही या चप्पलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या चप्पलमुळे व्यक्तिमत्त्वात भर पडते, शिवाय नेहमी या चप्पलचा वापर केला तर उन्हाळ्यामध्ये डोळ्यांना रखरखपणा व त्रास होत नाही. शिवाय चप्पल मजबूत व टिकावू असते. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे चप्पल तयार करून कुरिअरने पुरवठा केला जातो.कापशी चप्पलला मोठा इतिहास असून, या चप्पलमुळे कागल तालुक्याचेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात व परदेशातही प्रसिद्ध झाले आहे. हा व्यवसाय जतन करून भरभराटीला आणण्यासाठी आता शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे व चमड्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे चरितार्थ जेमतेम चालतो. शासनाकडून या व्यवसायासाठी अनुदान मिळाल्यास हा व्यवसाय पुन्हा जोमाने करणे शक्य होणार आहे. कच्चा माल उपलब्ध होण्यास अडचणी असल्यामुळे हा माल तयार करून ठेवणे परवडत नाही. त्यामुळे मागणीप्रमाणे चप्पल जोड करावे लागतात. कापशी चप्पल हे फक्त सेनापती कापशीमध्येच तयार केले जाते. इतर ठिकाणी याची नक्कल करून या नावाखाली विकून ग्राहकांची दिशाभूल केली जाते. - मुकुंद चव्हाण, कारागीरहा आमचा पारंपरिक चालत आलेला व्यवसाय आहे. चमडे कमवून त्यात कठीणपणा आणण्यास खूप श्रम करावे लागतात. चप्पल आकर्षक दिसण्यासाठी रूपकाम करावे लागते. याकरिता टिकली, जर, रिबिट, रिंग या साहित्यांचा वापर करावा लागतो. हे काम नाजूक व रेखीव असते. त्यामुळे वेळ लागतो. आमच्या येणाºया पिढीनेही हा व्यवसाय करावा, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत; पण कच्च्या मालाचे वाढलेले दर व एक जोड तयार होण्यास लागणारा वेळ पाहता याकरिता शासनानेच आनुदान द्यावे. चप्पल सजावट काम जोखमीचे व वेळखाऊ आहे. तरीही आम्ही हा व्यवसाय जोपासला आहे.- शालन मुकुंद चव्हाणसरसेनापती संताजी घोरपडेंचे संस्थान गावकोल्हापूर संस्थानमधील एकूण नऊ जहागिररींपैकी कापशी हे एक गाव. या गावची भौगोलिक रचना पाहता सभोवती डोंगर आहेत व गावाजवळ आल्याशिवाय गाव दिसत नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर हे गाव वसले आहे. कर्नाटकात मोहिमेवर जाताना अत्यंत सुरक्षित म्हणून त्यावेळच्या राजांनी या गावाची निवड केली. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे हे संस्थान गाव. यावरून या गावाला ‘सेनापती कापशी’ म्हणून ओळखले जाते.