शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' गावात दोनशे जणांच्या कुटुंबात बसवला जातो एकच गणपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 16:50 IST

सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवाती पासूनच सुमारे दोनशे कुटुंबसदस्यामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे.

अनिल पाटीलमुरगूड : विभक्त कुटुंब पद्धतीने एकत्र कुटुंबव्यवस्थेची शकले पडली असताना सण समारंभा मधून एकत्र येण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत आहे. पण याला अपवाद कागल तालुक्यातील यमगे या गावातील सरनोबत कुटुंब आहे. शेकडो वर्षांपासून सुमारे दोनशे सदस्य असणाऱ्या या कुटुंबात एकच गणपती बसवला जातो. सर्व धार्मिक विधी सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहात साजरे करत आहेत. समतेचा, एकतेचा संदेश देणारा सरनोबतांचा गणपती विभक्त कुटुंब व्यवस्थेला नक्कीच मार्गदर्शक आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे आचार विचारांची देवाण घेवाण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरवात केली. पण झपाट्याने बदलणाऱ्या समाजव्यवस्थेत हा मूळ हेतू मात्र दूर जाताना पहावयास मिळत आहे. मात्र, यमगे येथील सरनोबत कुटुंबात गणेश उत्सवाच्या सुरुवाती पासूनच सुमारे दोनशे कुटुंबसदस्यामध्ये एकच गणपती बसवण्याची प्रथा अखंडित आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी असलेले सर्व सदस्य गणेशोत्सवात एकत्र येतात.धान्य देऊन बनवून घेतली जाते श्री'ची मूर्तीसरनोबत गल्ली येथील सदाशिव दत्तात्रय सरनोबत पाटील यांच्या घरी अगदी विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गावातीलच कुंभार समाजाकडून धान्य देऊन अडीच तीन फूटाची शाडूची आकर्षक मूर्ती बनवून घेतली जाते. गणेशाच्या आगमनासाठी सुमारे पन्नास ते साठजण एकत्रित गणेशाचा जयजयकार करत जाऊन डोक्यावरून गणेश मूर्ती आणतात. गणेशाच्या आगमना पासून विसर्जना पर्यंत घरातील सर्वच सदस्य एकत्र आरती करतात.मुस्लिम बांधवांचाही सहभागीएखाद्या दिवशी प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम केला जातो. त्याच दिवशी या परिवारामार्फत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शिवाय गौरी जागरण करण्यासाठी दररोज रात्री परिसरातील महिला एकत्रित येत पारंपरिक गीतांचे सादरीकरण करतात. उत्सव काळात शेजारील मुस्लिम बांधवही सर्व कार्यक्रमात सहभागी असतात. गणेश विसर्जन अत्यंत साधेपणाने केले जाते.  त्यामुळे समतेचा संदेश देणारा हा सरनोबतांचा गणपती परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव