शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

Independence Day (12590) कोल्हापूरच्या ११८ जवानांचे बलिदान स्वातंत्र्यदिनानिमित्त स्मृतींना उजाळा : १९६२ पासून देशासाठी विविध युद्धांत जिगरबाज कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 21:59 IST

देशाच्या रक्षणासाठी छातीवर गोळी झेलत आपले रक्त सांडणाऱ्या वीर जवानांची व शौर्याची कोल्हापूर ही रणभूमी आहे. या भूमीतून १९६२ पासून आतापर्यंत ११८ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे बलिदान तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : देशाच्या रक्षणासाठी छातीवर गोळी झेलत आपले रक्त सांडणाऱ्या वीर जवानांची व शौर्याची कोल्हापूर ही रणभूमी आहे. या भूमीतून १९६२ पासून आतापर्यंत ११८ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे बलिदान तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. त्याचबरोबर अनेक जवान आजही देशसेवेसाठी सीमेवर लढत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांच्या धगधगत्या शौर्याचा इतिहास व बलिदानाची परंपरा सांगणारी ही कोल्हापूरची रणभूमी आहे. हिने देशाच्या रक्षणासाठी आतापर्यंत हजारो जवान दिले आहेत. त्यांतील अनेक जवान भारत-पाकिस्तान व भारत-चीनच्या सीमेवर शत्रूशी लढताना धारातीर्थी पडले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरचे भरतीचे प्रमाण अधिक आहे. १९६२ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ११८ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये शहीद जवान अभिजित सूर्यवंशी (कोल्हापूर), जवान दिगंबर उलपे (कसबा बावडा), जवान नारायण तुपारे (कार्वे, ता. चंदगड), जवान महादेव तुपार (महिपालगड, ता. चंदगड), जवान सावन माने (गोगवे, ता. शाहूवाडी), प्रवीण येलकर (भैरेवाडी, ता. आजरा), अनंत धुरी (बेलेभट, ता. चंदगड) अशा अलीकडच्या काळातील निवडक जवानांची नावे घ्यावी लागतील. या शहीद जवानांचे बलिदान आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाºया या जवानांच्या स्मृतींना ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उजाळा मिळाला आहे.लष्करातील मोठ्या हुद्द्यांवरील कोल्हापूरचे वीरलष्करात मोठ्या हुद्द्यावर जाऊन देशसेवा करण्याची परंपरा कोल्हापूरचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल (कै.) एस. पी. पी. थोरात यांच्यापासून सुरू झाली आहे. यानंतर आतापर्यंत मेजर जनरल शिवाजीराव पाटील (कसबा वाळवे, ता. राधानगरी), मेजर जनरल ए. बी. सय्यद (ताराबाई पार्क, कोल्हापूर), मेजर जनरल मधुकर काशीद (आर. के.नगर, कोल्हापूर), मेजर जनरल उदयकुमार उपाध्ये (न्यू पॅलेस परिसर, कोल्हापूर), ब्रिगेडीअर विजयसिंह घोरपडे (साईक्स एक्स्टेंशन, कोल्हापूर), ब्रिगेडीअर उदय थोरात (कसबा बावडा रोड, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. ते निवृत्तीनंतरही लष्करात येणाºया तरुणांसाठी प्रेरणादायी असून आदर्शवत आहेत. तसेच देशासाठी शहीद झालेल्या कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये शहीद कर्नल जयवंत व्ही. महाडिक (कोल्हापूर) व शहीद मेजर सत्यजित शिंदे (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.