शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जादा प्रवासी वाहतूक करणारे आरटीओच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 15:23 IST

यापुढेही तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे.

ठळक मुद्देचार वाहनांवर कारवाई : तपासणी मोहीम तीव्र करणार

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात मान्यतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारे आरटीओच्या रडारवर आले आहेत. आरटीओंनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, कडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात दोन रिक्षा आणि दोन कार अशा चार वाहनांवर कारवाईही करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांनी दिली.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रवाशांची संख्या निश्चित करून सार्वजनिक वाहतुकीला परवानगी दिली गेली. त्यानुसार रिक्षामध्ये दोन, कारमध्ये तीन असा नियम घालून देण्यात आला, तथापि मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली. यात चारजण उल्लंघन करीत असल्याचे आढळले. रिक्षा क्रमांक एम एच ०९ जे ५९३३ मधून १० प्रवासी प्रवास करीत होते. एम एच ०९ ईएल ०८१८ या रिक्षातून ४ जण प्रवास करताना आढळले. मारुती ओम्नी एमएच ०९ वाय ००७७ यातून ९, महिन्द्रा लोगॉन एमएमच ०२ डीबी ०३०४ या कारमधून पाचजण प्रवास करीत होते. मोटार वाहन कायद्यानुसार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांनी ही कारवाई केली.

यापुढेही तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अल्वारीस यांनी केले आहे.

टॅग्स :Ruturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूर