शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

घरातून काम करण्यासाठी नियमांची चौकट केली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 13:11 IST

भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यासाठी केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करून देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी, असे मुद्दे

ठळक मुद्देपालकमंत्री : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांशी ‘व्हीसी’द्वारे संवाद

कोल्हापूर : कोरोनामुळे भविष्यात निदान आय.टी. क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे आव्हान मोठे असेल. या सर्वांचा विचार करून या संदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासमोर ‘व्हीसी’द्वारे मांडली.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आय. टी. क्षेत्राची सद्य:स्थिती व कोरोनानंतरच्या काळातील रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भात आय. टी. क्षेत्राची भविष्यातील वाटचाल व धोरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली.

येणाऱ्या काळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटलायझेशनची वाढ होणार आहे. अशावेळी सायबर गुन्ह्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक संशोधकांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, रोबोटिक्स आणि हेल्थकेअर क्षेत्रांत बरेच नवीन संशोधन केले आहे.

यासारख्या संशोधकांना किंवा संशोधन संस्थांच्या नवनवीन शोधांना मंजुरी देण्यासाठी तसेच ते प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक खिडकी योजना आखावी. भविष्यात व्हर्च्युअल शिक्षण हेच सर्वव्यापी असेल. त्यासाठी केंद्र शासनाने देशात तयार झालेले स्वदेशी तंत्रज्ञान सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत उपलब्ध कसे करून देता येईल, याबाबत मार्गदर्शन व पायाभूत सुविधा उपलब्ध करावी, असे मुद्दे पालकमंत्र्यांनी यावेळी चर्चेत मांडले.‘फिनटेक कॅपिटल’साठी केंद्र सरकार सहकार्य करील : पालकमंत्रीमहाराष्ट्र राज्य हे मुंबईला फिनटेक कॅपिटल म्हणून उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. जागतिक बाजारपेठेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील