शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारू उत्पादक

By admin | Updated: July 4, 2015 00:21 IST

लक्ष्मण माने : ‘भटके विमुक्त’ संघटनेतर्फे सोमवारी मोर्चा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारूचे उत्पादक असल्याचा आरोप, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. भटके विमुक्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.माने म्हणाले, २० जूनला मालवणी, मुंबई येथे विषारी दारू पिऊन १०४ लोक प्राणास मुकले. हे निमित्त करून राज्यभरातील कंजारभाट, पारधी, वडार आणि इतर जमातींच्या वसाहतींवर पोलिसांनी धाडी टाकणे सुरू केले आहे. वस्तुत: दारू काही कंजारभाट, पारधी, वडार किंवा कैकाडी जमाती विकत नाहीत. दारूभट्ट्या तर आता सर्व साखर कारखाने ‘डिस्टिलरी’च्या गोंडस नावाखाली तयार करून राजरोस सरकारदरबारी परवाने घेऊन विकत आहेत. आमचा दारूबंदीस पाठिंबा आहे परंतु ती करायची तर सर्वच प्रकारची दारू बंद करा. शासन ढोंगीपणा करत आहे. पिढ्यान्-पिढ्या दारू गाळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे आहे त्यांची हातभट्टी. यामधून निर्माण होणारे अल्कोहोल हे वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात परदेशातून आयात होणाऱ्या अल्कोहोलऐवजी वापरल्यास शासनाचे कोट्यवधी रुपये वाचतील परंतु आमच्या दारूला विषारी ठरवायचे व राज्यकर्त्यांच्या दारूला प्रतिष्ठा द्यायची हे मनुस्मृतीतील कायद्याला धरूनच आहे.या विरोधात तसेच शहरात माकडवाले, पारधी, डोंबारी, कैकाडी, गोंधळी, भोई, डवरी, जोशी या समाजातील लोकांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी जागा दिल्या आहेत, परंतु तेथील जागांवर आजतागायत तेथील रहिवाशांची नावे लागलेली नाहीत. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होईल. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज मार्गावरून हा मोर्चा जाईल.यावेळी शाबू दुधाळे, सज्जनसिंग चितोडिया, समशेरसिंग कलानी, जगन्नाथराव जाधव, विलासराव तामायचीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)