आरटीओ कार्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:24 IST2021-04-15T04:24:00+5:302021-04-15T04:24:00+5:30
आरटीओ कार्यालयाची सेवा महत्त्वाची असली तरी ती अत्यावश्यक सेवा नसल्यामुळे जनतेला आवाहन आहे की, त्यांनी आपला व आपल्या प्रियजनांचा ...

आरटीओ कार्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद
आरटीओ कार्यालयाची सेवा महत्त्वाची असली तरी ती अत्यावश्यक सेवा नसल्यामुळे जनतेला आवाहन आहे की, त्यांनी आपला व आपल्या प्रियजनांचा जीव सांभाळावा. कार्यालय सुरु झाल्यानंतर आपली कामे करून घेता येतील, होणारे नुकसान भरून काढता येणार नाही. कच्चे व पक्के लायसन्स, वाहन नोंदणी वाहन, हस्तांतरण व इतर अनुषंगिक कामे, परवाना विषयक कामे सर्व बंद ठेवण्यात येत आहेत. अंमलबजावणी पथकाचे काम चालू राहणार आहे. वाहन अधिग्रहण, वाहनांची तपासणी, रस्ता सुरक्षा विषयक कामकाज, सार्वजनिक व खासगी वाहनांची तपासणी यासाठी या पथकांचे कामकाज चालू राहणार आहे. यापू्र्वी शेवटच्या टप्प्यात असणारी कामे, अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनासंबंधी कामे, व्यक्तीचा थेट संबंध न येणारी कामे फक्त अशीच कामे केली जातील असेही अल्वारिस यांनी स्पष्ट केले आहे.