शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:28 IST

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकितरघुनाथ पाटील यांचा आरोप, कोल्हापूर,सांगलीतील कारखाने

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांनी या हंगामातील शेतकऱ्यांचे १२३६ कोटी रूपये थकवले आहेत. यामध्ये जुन्या २९ कोटी रूपयांचाही समावेश आहे. ही थकित रक्कम आणि न दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन बंद केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.दोन्ही साखर कारखान्यांनी नेमकी किती रक्कम थकवली आहे याची अधिकृत आकडेवारी सांगत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कायदा मोडणाऱ्या कारखानदारांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.पाटील म्हणाले, एकीकडे उच्च न्यायालयाने २0१३ मध्ये सर्व कारखान्यांना सर्व ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एका हंगामामध्ये वेगवेगळा दर देता येणार नाही असा निर्णय दिला असताना आताही आधीच्या शेतकऱ्यांना एक तर नंतरच्या शेतकऱ्यांना एक दर दिला जात आहे.शेतकऱ्यांना चौदा दिवसात एफआरपी द्यावी असा कायदा असताना तो न पाळणाऱ्यांना शिक्षा न देता,त्यांचा गाळप परवाना रदद न करता त्यांनाच पाठीशी घातले जात आहे. केवळ एफआरपी देवून चालणार नाही. तर थकलेल्या रकमेवरील १५ टक्के व्याजही मिळाले पाहिजे असे पाटील म्हणाले.पत्रकार परिषदेला शिवाजी माने, धनाजी चडमुंगे, पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अजित पाटील, राजू कुरंदाळे, बळवंत कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर