शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बटालियनमध्येच होत होती जवानांची लूट : अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:15 AM

दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी ...

ठळक मुद्दे अनेक वर्षांपासून सुरू होता गैरव्यवहार

दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी केली होती तरीही अधिकाºयांना त्याची कोणतीही भीती वाटत नव्हती हे विशेष.

भारतीय राखीव बटालियन क्रमांक तीनचा कारभार सुरुवातीपासून वादग्रस्त आहे. येथील समादेशकाच्या हाताखालच्या टोळीकडून जवानांची पिळवणूक होत होती. ड्यूटी न लावणे, रजा देण्यासाठीही पैशांची मागणी येथे केली जात असे. जवानांकडून प्रत्येक कामात पैसा घेतला जात असल्याने ते हतबल झाले होते. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतून पैसा गोळा करणे इतकेच काम ही टोळी करीत होती. ‘पैसा देईल त्याचेच काम’ असा इथला कारभार होता अशी चर्चा सुरु होती.जिथे नक्षलवाद्यांचा प्रभाव अधिक आहे, त्या ठिकाणी बटालियन कार्यरत असते. मात्र, या दलातील समादेशकांकडून जवानांची आर्थिक पिळवणूक होत आहे. बाहेर बदली नको असेल तर महिन्याला पाच हजार रुपये मोजावे लागतील, असा सज्जड दमही जवानांना दिला जात होता. जवानांसाठी स्वतंत्र खानावळ आहे. मात्र, त्याठिकाणी कधीही जेवण दिले जात नाही. उलट जवानांकडूनच दर महिन्याला २५०० रुपये घेतले जातात. त्याचा हिशेब मात्र कुठेच कागदोपत्री दिसत नाही. हे पैसे नेमके जातात कुठे याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी ‘वर्ग चार’च्या कर्मचाºयांकडून पदोन्नतीचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये काढले होते. पैसे देऊनही पदोन्नत्या मिळालेल्या नाहीत. एखादा कर्मचारी वैद्यकीय रजा घेवून हजर होणार असेल तर पाच हजार रुपये घेऊन मुंबई गाठायची. याठिकाणी बसलेल्या समुपदेशकाला पैसे द्यायचे. या समुपदेशकाचे कार्यालयात कमी आणि मुंबईत जास्त वास्तव्य आहे.चर्चा लग्नाचीबटालियनमधील एका वरिष्ठ अधिकाºयाच्या मुलाचे लग्न जळगावमध्ये झाले. त्यासाठी दौंड, मुंबई, गडचिरोली, कर्नाटक आणि कोल्हापुरातून रसद पुरविण्यात आली होती. त्याची चर्चा राज्यभर झाली.अलिखित रेटकार्डचालक प्रशिक्षण - १० हजार रुपयेआर्मर प्रशिक्षणासाठी - ७० हजार रुपयेगैरहजर राहिल्यास- ५ हजार रुपयेखानावळ - २५०० रुपयेहजेरी सवलत - १०० ते १ हजार