शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

‘उत्तर’साठी ऋतुराज यांचा जोर -: ‘राधानगरी’ काँग्रेसकडेच घेण्याची नेत्यांची एकमुखी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:22 IST

तौफिक मुल्लाणी यांनी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के यशाची खात्री दिली.आपला स्वार्थ नाही, कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘उत्तर’मधून कॉँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू.

ठळक मुद्दे विधानसभेसाठी मुलाखती

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून युवा नेते ऋतुराज संजय पाटील, माजी महापौर सागर चव्हाण, दौलत देसाई, आदींनी कॉँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली. पाटील, चव्हाण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत या मतदारसंघात कॉँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. राधानगरीमधून अर्धा डझन इच्छुक असले तरी, हा मतदारसंघ कॉँग्रेसला घेऊन आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, अशी एकमुखी मागणी निरीक्षकांकडे केली.

कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक अजय छाजेड, आनंदराव पाटील यांनी सोमवारी कॉँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राधानगरीतून ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, सत्यजित जाधव, हिंदुराव चौगले, उदयसिंह पाटील-कौलवकर, यशवंत हाप्पे, विजयसिंह मोरे इच्छुक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत राधानगरी कॉँग्रेसकडे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, कृष्णराव किरुळकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे, आदी उपस्थित होते.

‘कोल्हापूर उत्तर’मधून संजय पाटील यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे आंदोलक असल्याने त्यांना छेद देण्यासाठी आपल्यासारख्या आंदोलकाला संधी देण्याची मागणी केली. तौफिक मुल्लाणी यांनी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के यशाची खात्री दिली. ‘मनपा’ पोटनिवडणुकीत विद्यमान आमदारांच्या वॉर्डात कॉँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याची किमया आमदार सतेज पाटील यांनी केल्याचे सांगून ऋतुराज पाटील म्हणाले, शहरात महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात पक्ष वाढविण्याचे काम केले. शहरात अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी पक्षाने संधी द्यावी. आपला स्वार्थ नाही, कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘उत्तर’मधून कॉँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू. सागर चव्हाण म्हणाले, चव्हाण कुटुंब कॉँग्रेसचे निष्ठावंत आहे. शहरातील कॉँग्रेस म्हणजे चव्हाण असेच समीकरण आहे. सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी जबाबदारी दिल्यास ताकदीने लढू. माजी उपमहापौर विक्रम जरग म्हणाले, १९६७ पासून चव्हाण कुटुंब महापालिकेच्या राजकारणातून शहराच्या विकासासाठी झटत आहे. झोपडपट्टी, शिंगणापूर पाणी योजना, थेट पाईपलाईनसह विविध विकासकामे चव्हाण पिता-पुत्रांच्या महापौर कालावधीतच मार्गी लागली.

‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, आतापर्यंत सहा वेळा शिरोळमधून उमेदवारी मागितली; पण धनदांडग्यांचा विचार झाला. यावेळी आपण आग्रही नाही. गणपतराव पाटील व आपणापैकी कोणालाही द्या. शाहूवाडीतून जिल्हा बॅँकेचे माजी संचालक अमर पाटील, राज्य बॅँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, ओकांर सुतार यांनी मागणी केली. शाहूवाडीतील राष्टÑवादी शिवसेनेसोबत आहे. आपण संधी दिली तर निश्चितच लढू. मित्रपक्षाला पाठिंबा द्यायचा म्हटला तरी हरकत नसल्याचे अमर पाटील यांनी सांगितले.

दक्षिणमधून आमदार सतेज पाटील यांची एकमुखी मागणी एकनाथ पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, प्रदीप झांबरे यांनी केली. इचलकरंजीतून प्रकाश आवाडे व राहुल खंजिरे यांनी, तर हातकणंगलेतून राजू आवळे, किरण कांबळे, प्रशांत कांबळे, संगीता हंडोरे यांनी मागणी केली.

चव्हाण, हंडोरे, ऋतुराज, ‘पी. एन.’ यांचे शक्तिप्रदर्शनसागर चव्हाण, संगीता चंद्रकांत हंडोरे, ऋतुराज पाटील व पी. एन. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कॉँग्रेस कमिटी दणाणून गेली....अन्यथा कर्नाटकसारखी अवस्था

उमेदवारी देताना निष्ठावंतांना द्या.अन्यथा, कर्नाटकसारखी अवस्था होईल. महाराष्टÑातही फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते, अशी भीती मुल्लाणी यांनी व्यक्त केली.

शंकररावांचे ‘खानविलकर’ प्रेमकरवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील हे पी. एन. पाटील यांच्या समर्थनार्थ बोलताना, कोणत्याही परिस्थितीत २०१९ ला दिग्विजय खानविलकर आमदार असतील, असे बोलून गेले. यावर हरकत घेत, ‘बघा पी. एन. साहेब पहिले यांना तपासा’, असा चिमटा सतेज पाटील यांनी काढला.आवाडे समर्थकांची ‘हातकणंगले’तून मागणीप्रकाश आवाडे यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी हातकणंगलेमधून मागणी केली.गेली अनेक वर्षे कॉँग्रेसकडून बौद्ध समाजाला उमेदवारी दिलेली नाही. येथे या समाजाची संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चंदगड’, ‘कागल’चे इच्छुक गैरहजरचंदगडमधून मागणी केलेले माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील हे दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेल्याने विद्याधर गुरबे हे एकमेव इच्छुक आहेत. तेही पावसामुळे मुलाखतीसाठी आले नाहीत.कागलमध्ये दत्ताजीराव घाटगे यांनीही पाठ फिरविली. करवीरमधून जिल्हा बॅँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांनी मागणी केली होती; पण त्याही मुलाखतीसाठी आल्या नाहीत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर