शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कडाडलेले भाजीपाल्याचे दर आवाक्यात: वाहतूक सुरू झाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:43 AM

Market Kolhpaur Flood: महापूर आणि बंद असलेल्या वाहतूक मार्गाचा गैरफायदा घेत भाजीपाल्याच्या केलेल्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा मंगळवारी वाहतूक सुरू झाल्यानंतर संपुष्टात आला आणि चार दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याचे दर मागील आठवड्यासारखे पूर्ववत झाले. डाळी, कडधान्याचीही आवक सुरू झाल्याने दरही स्थिर आहेत. दरम्यान, भाजीपाल्याचे आगर असलेल्या शिरोळ, करवीर तालुक्यातून महापुरामुळे आवक कमी झाल्याने कर्नाटकातील भाजीपाल्यावर कोल्हापूरकरांची भूक भागत आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याच्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा संपला कर्नाटकच्या भाजीपाल्यावर भागतेय कोल्हापुरकरांची भूक

कोल्हापूर : महापूर आणि बंद असलेल्या वाहतूक मार्गाचा गैरफायदा घेत भाजीपाल्याच्या केलेल्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा मंगळवारी वाहतूक सुरू झाल्यानंतर संपुष्टात आला आणि चार दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याचे दर मागील आठवड्यासारखे पूर्ववत झाले. डाळी, कडधान्याचीही आवक सुरू झाल्याने दरही स्थिर आहेत. दरम्यान, भाजीपाल्याचे आगर असलेल्या शिरोळ, करवीर तालुक्यातून महापुरामुळे आवक कमी झाल्याने कर्नाटकातील भाजीपाल्यावर कोल्हापूरकरांची भूक भागत आहे.आपत्तीतही लाभ उठवण्याची प्रवृत्ती यावेळच्या महापुरातही दिसली. महापुरामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने लगेच दरात चारपटीने वाढ झाली. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कोल्हापूर शहरात कोथिंबिरीची एक पेंडी शंभर रुपयांवर, मिरची शंभर रुपयांवर, तर वांगी दोनशे रुपये किलोवर गेली होती. टोमॅटोही १५० रुपये किलो दराने विकले जात होते. पण सुदैवाने सोमवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.

महापुराचे पाणीही ओसरू लागल्याने प्रमुख मार्गही वाहतुकीसाठी खुले होऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग शंभर टक्के खुला झाल्याने चार दिवसांपासून अडकलेली सर्व वाहने मार्गस्थ झाली. परिणामी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांत भाजीपाल्याचा पुरवठा वाढला. आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा कमी झाला असून, दर मागील आठवड्याप्रमाणे पूर्ववत झाले. त्यामुळे बाजारात ग्राहकांकडून मनसोक्त खरेदी झाली. दिवसभर बाजारात भाजीच्या खरेदीसाठी गर्दी कायम होती.वांग्यांना चढला भावसर्व भाजीपाल्याचे अचानक वाढलेले दर कमी झाले असताना, वांग्यांनी मात्र चांगलाच भाव खाल्ला आहे. ३० ते ४० रुपयांना पावकिलो असा वांग्याचा दर आहे. भरताचे वांगेदेखील २० रुपयांना एक असे विकले जात आहे. पांढरी वांगी किलोला सव्वाशे ते दीडशेवर गेल्याने काळ्या वांग्यांना मागणी वाढली आहे, पण त्याचेही दर १०० रुपयांच्या घरातच असल्याने वांगी सर्वसामान्यांच्या परवडण्याच्या पलीकडे गेली आहेत.प्रमुख भाजीपाल्याचे दर असे (किलोमध्ये)

  • वांगी १२० ते १४०
  • टोमॅटो २५ ते ३०
  • भेंडी ७० ते ८०
  • ढबू ४० ते ५०
  • घेवडा ८० ते १००
  • बिन्स १२०
  • वरणा ७० त ८०
  • कांदा १५ ते २५
  • बटाटा २० ते २५
  • पेंडीचे दर असे
  • मेथी १० ते १५
  • शेपू १०
  • पोकळा १०
  • कांदापात १० ते १५
  • शेवगा १० ते २०
  • कोथिंबीर २० ते २५ 

डाळी कडधान्ये (किलोमध्ये)

  • तूरडाळ: १००
  • मूगडाळ: १२०
  • उडीद डाळ: १२०
  • चवळी: ९०
  • हिरवा मूग: १००
  • हिरवा वाटाणा: ९०
  • मटकी: १२०
  • मसुरा ९०
  • मसूर डाळ ९०
  • हरभरा डाळ ७८
  • ज्वारी ३० ते ५८
  • गहू ३० ते ३५
  • बाजरी ३०
  • नाचणा ४०

 

टॅग्स :MarketबाजारKolhapur Floodकोल्हापूर पूर