जंगलावर वननिवासींचाच अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:08+5:302021-04-23T04:25:08+5:30

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार ...

The right of forest dwellers to the forest | जंगलावर वननिवासींचाच अधिकार

जंगलावर वननिवासींचाच अधिकार

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक व संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश भोले यांनी केले. खानापूर (जि. बेळगाव) येथे वनहक्क संघर्ष समितीतर्फे 'वनहक्क व जमीन कायदा' या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रा. भाले म्हणाले, डंगे धनगर, सिद्दी समाज, आदी वननिवासींनी जंगलसमृद्धीची परंपरा कायम ठेवली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने वननिवासींच्या बाजूने कायदा केला आहे. कायद्यानुसार सांस्कृतिक, रूढी, परंपरा, देवस्थान यात्रा करू शकता. सामुदायिक व वैयक्तिक दावे करू शकता व शाळा सुरू करू शकता.

कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामसभा व वनहक्क समिती महत्त्वाची आहे. कॉ. संपत देसाई म्हणाले, ही लढाई जिंकण्यासाठी संयम आवश्यक आहे. कायदा हे शस्त्र आहे. कायदा आपल्या बाजूने आहे. या शस्त्राचा वापर लढा यशस्वी करण्यासाठी करूया.

यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या धनश्री सरदेसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, अभिजित सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रणजित कालेकर, कृष्णा सावंत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी : खानापूर (जि. बेळगाव) येथील जंगल हक्क व जमीन कायदा कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करताना महादेव मरगळे. यावेळी अविनाश भाले, कॉ. संपत देसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, धनश्री सरदेसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०४२०२१-गड-०२

Web Title: The right of forest dwellers to the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.