शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ए.एस. ट्रेडर्सचे परतावे झाले बंद, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले, कंपनीच्या प्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल

By विश्वास पाटील | Updated: November 23, 2022 10:24 IST

Kolhapur: कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे.

 - विश्वास पाटील 

कोल्हापूर - कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे. त्यासंबंधीचा त्यांचा स्वत:चा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. परतावे बंदच्या घोषणेमुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

सुमारे अडीच मिनिटांच्या अर्धवट व्हिडीओमध्ये सुभेदार यांनी कंपनीसमोरील अडचणी मांडल्या आहेत. त्यात ते म्हणतात, गेले काही दिवस परतावे देण्यात विलंब होत होता. परंतु, आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की परतावे (रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट) थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. आपला निधी इक्विटीमध्ये सुरक्षित आहे. आजच्या घडीला ही कंपनी चालवायची की बंद करायची असा विचार माझ्या मनात घोळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ८ ते १० हजार गुंतवणूकदारांची झूम बैठक घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेऊ.

सुभेदार आजारी होते तर मग दुबईला कसे गेले, वेब मीटिंगला स्कीनवर दिसत होते तर मग ऑनलाईन शेअर ट्रेडिंग का केले नाही..? त्यांनी किती कंपन्यांची नोंदणी सेबीकडे केली आहे..? कंपनीचे कोणते खाते सेबीकडे सुरू आहे..? त्याचा पुरावा त्यांनी द्यावा, अशी मागणी एलएलपी विरोधी कृती समितीने केली आहे. या कंपनीने एक रुपयाचाही शेअर खरेदी केलेली नाही मग कोणत्या इक्विटीमध्ये पैसे अडकले, हे जाहीर करावे. गेल्या सहा महिन्यांत शेअर मार्केट वधारले असताना यांच्याच कंपनीला कसा तोटा झाला आणि परतावे थांबवण्याचा निर्णय कोणत्या कायद्यानुसार घेतला, अशी विचारणा समितीने केली आहे. पैसे द्यायला रांग का लागली..?ही कंपनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिन्याला तीन हजार रुपये परत देत असे. तीन वर्षांनंतर मूळ मुद्दलही परत मिळणार होती. हा बिझनेस जे लोक देतात त्यांना साखळीमधील गुंतवणुकीवरही वेगळे कमिशन मिळत होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ची तर गुंतवणूक केलीच शिवाय लोकांना यामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले. एकाचे बघून एकाने पैसे गुंतवले. त्यातील काहींना लाभ झाला..बरेचसे आता अडकले.करवीर पूर्व भागात गुंतवणूकया कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. मुख्यत: करवीर तालुक्यातील बीडशेड, आरे, बीड, सावरवाडी, बहिरेश्वर, गणेशवाडी, माळ्याची शिरोली, कोपार्डे, शिंदेवाडी या गावांतून या कंपनीत काही कोटींमध्ये गुंतवणूक झाली आहे. लोकांनी बँकांतील ठेवी मोडून, सोने तारण ठेवून यामध्ये गुंतवणूक केली आहे. व्यापारी, दुकानदार, शिक्षक, छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी रक्कम गुंतवली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा