शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ओखी वादळाचा परिणाम, कोल्हापुरात ढगाळ वातावरण..हलका पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 11:30 IST

केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस वातावरण आरोग्य बिघडवणारे

कोल्हापूर : केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे.

यंदाच्या हिवाळ्यात थंडी अशी सुरू होते तोपर्यंत वातावरणात बदल होतो आणि थंडी पळून जाते, असे दोनवेळा झाले आहे. गेल्या दोन दिवसांतही तसाच अनुभव पुन्हा आला. आता कुठे जरा थंडी जाणवू लागली होती तोपर्यंत रविवारपासूनच हवा दमट झाली. त्यामुळे थंडी गायब झाली. सोमवारी तर दिवसभर कुंद वातावरण राहिले. त्यामुळे निरूत्साह जाणवला.

सायंकाळी पाचच्या सुमारास हलका पाऊस झाला. या वातावरणामुळे ताप-थंडीसह अंगदुखीचा त्रास सुरू झाला. जिल्ह्यात सध्या साखर व गूळ हंगाम जोमात सुरू झाला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या. पाऊस झाल्यास कारखान्यांच्या तोडणी-ओढणी कार्यक्रमावर परिणाम होतो. त्याशिवाय उसाच्या उताऱ्यांतही घट होते.

गुळाच्या प्रतीवरही या वातावरणाचा परिणाम होतो. रब्बीच्या पिकांना थंडी पोषक असते. दमट वातावरण झाल्यास आंब्यासह अनेक फळपिकांची फूल गळून पडून पडतात. त्याचा उत्पादनांवर परिणाम होतो. पिकांतील किडीचे प्रमाण वाढते म्हणजे हे वातावरण लोकांना आणि पिकांनाही घातक असते. 

 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळRainपाऊस