शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:43 IST

दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देदहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला१३९१ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; मुलींची आघाडी कायम; निकालात १.८३ टक्क्याने घट

कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला.कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी दिली. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पवार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, साताऱ्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी एम. जी. चंदुरे, सांगलीचे विज्ञान पर्यवेक्षक पी. एस. मलगुंडे उपस्थित होते. राज्य शिक्षण मंडळाकडून दि ९ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ८१५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१२६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३९१ जण उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १६. १२ टक्के आहे.

विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा २२. ५७ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. सांगली १६.६३ टक्क्यांसह द्वितीय, तर ९.५८ टक्क्यांसह सातारा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. राज्याच्या एकूण निकालात कोल्हापूर विभाग आठव्या क्रमांकावर आहे. निकालाची आॅनलाईन प्रत विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून घेता येणार असल्याचे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले.

जिल्हानिहाय निकालजिल्हा टक्केवारी

  1.  कोल्हापूर २२.५७
  2.  सांगली १६.६३
  3.  सातारा ९.५८

 

विभागातील आकडेवारी दृष्टिपेक्षात

  1. उत्तीर्ण मुलांची संख्या : ९७४
  2. उत्तीर्ण मुलींची संख्या : ४१७
  3. कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७८
  4. सांगलीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५१५
  5. साताऱ्यातील उत्तीर्ण विद्यार्थी : २९८

 

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणेया परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रावर सहा गैरमार्गाची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक सहा प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. साताऱ्यामध्ये एक प्रकरण घडले. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे, असे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्याची मुदत ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत, तर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ८ सप्टेंबरपर्यंत आहे.

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८kolhapurकोल्हापूर