शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:43 IST

दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देदहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला१३९१ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले; मुलींची आघाडी कायम; निकालात १.८३ टक्क्याने घट

कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला.कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी दिली. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पवार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, साताऱ्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी एम. जी. चंदुरे, सांगलीचे विज्ञान पर्यवेक्षक पी. एस. मलगुंडे उपस्थित होते. राज्य शिक्षण मंडळाकडून दि ९ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ८१५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१२६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३९१ जण उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १६. १२ टक्के आहे.

विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा २२. ५७ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. सांगली १६.६३ टक्क्यांसह द्वितीय, तर ९.५८ टक्क्यांसह सातारा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. राज्याच्या एकूण निकालात कोल्हापूर विभाग आठव्या क्रमांकावर आहे. निकालाची आॅनलाईन प्रत विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून घेता येणार असल्याचे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले.

जिल्हानिहाय निकालजिल्हा टक्केवारी

  1.  कोल्हापूर २२.५७
  2.  सांगली १६.६३
  3.  सातारा ९.५८

 

विभागातील आकडेवारी दृष्टिपेक्षात

  1. उत्तीर्ण मुलांची संख्या : ९७४
  2. उत्तीर्ण मुलींची संख्या : ४१७
  3. कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७८
  4. सांगलीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५१५
  5. साताऱ्यातील उत्तीर्ण विद्यार्थी : २९८

 

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणेया परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रावर सहा गैरमार्गाची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक सहा प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. साताऱ्यामध्ये एक प्रकरण घडले. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे, असे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्याची मुदत ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत, तर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ८ सप्टेंबरपर्यंत आहे.

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८kolhapurकोल्हापूर